शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

वांबोरीकरांची झोप उडाली..

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

अहमदनगर : वांबोरी (ता.राहुरी) या ठिकाणी गेल्या शनिवार पासून भयावह परिस्थिती आहे. दररोज रात्री सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ आणि अफवांच्या पिकामुळे वांबोरीकरांच्याझोपा उडल्या आहेत.

अहमदनगर : वांबोरी (ता.राहुरी) या ठिकाणी गेल्या शनिवार पासून भयावह परिस्थिती आहे. दररोज रात्री सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ आणि अफवांच्या पिकामुळे वांबोरीकरांच्याझोपा उडल्या आहेत. गत पाच दिवसांत गावातील चार ठिकाणी चोऱ्या झाल्या असून दोन पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेले आहे. रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त सुरू असली तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. वांबोरी गाव आणि परिसरात असणाऱ्या वाड्या वस्त्यांना चोरट्यांनी आपले लक्ष केले आहे. गत आठवड्यात पहिल्या दिवशी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर गावात रोज रात्री चोर आले, अशी अफवा पसरत आहे. यात काही ठिकाणी चार पेक्षा अधिक तरूणांना पळताना पाहिले असल्याचा दावा करण्यात येत आहे.वस्तूस्थितीत यात तथ्य असले तरी प्रत्यक्षात या चोरट्यांना पाहण्याची संख्या अत्यंत कमी आहे. काही ठिकाणी दगडे फेकली, घरांच्या कड्या लावल्या, घरा शेजारी अंधारात बसले होते. रात्रीच्या वेळी झाडावर बसलेले होते, रस्ता अडविला, आदी कारणे नागरिक एकमेंकाना सांगताना दिसत आहेत. रात्री ९ पासून अमुक वस्तीकडे चोर दिसले, धावा पळा असा आरडा ओरडा होतो, शेकडो तरूण हातात काठ्या, कुऱ्हाडी, लाकडी दंडूके घेऊन सैरावैरा पळताना दिसत आहे. यामुळे याच गोंधळात चोर असले तरी क्षणात गायब होत आहेत. यामुळे गोंधळाची परिस्थिती कायम आहे.विशेष म्हणजे गावातील मुस्लीम गल्ली, विठ्ठलवाडी झोपडपट्टी, शासकीय विश्रामगृह परिसर, पुलवाडी, घोडेपीर, पटारे वस्ती या ठिकाणी चोर आले असल्याची चर्चा आहे. मात्र, या ठिकाणी कोणीच सापडलेले नाही. त्याच त्या दररोज उठणाऱ्या अफवांमुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांसह लहान मुलेही रात्रभर झोपत नाहीत. पोलिसांनी वेळीच चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)गेल्या पाच दिवसांपासून वांबोरी परिसरात रात्रीच्या वेळी चोर आल्याचा आरडा-ओरडा होत आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता संयमाने परिस्थितीचा सामना करावा. अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि कृपया पसरवू नका.- अ‍ॅड. सुभाष पाटील, ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद सदस्य.वांबोरी येथील चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. लवकर चोरट्यांना पकडण्यात येईल. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याचे आदेश दिलेले आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा आणि चोरीचा तपास लावू.- सुनीता ठाकरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर.