शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

बांगर्डेतील आदिवासी वस्तीत पायाभूत सुविधांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील बांगर्डे शिवारातील रखरखत्या माळरानावर तीन ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजातील १० ते १२ कुटुंबांनी पाले ठोकली आहेत. ...

श्रीगोंदा : तालुक्यातील बांगर्डे शिवारातील रखरखत्या माळरानावर तीन ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजातील १० ते १२ कुटुंबांनी पाले ठोकली आहेत. ऊस तोडणी मजुरीते ते काम करतात. या कामातून त्यांनी अनेकांच्या जीवनात गोडवा निर्माण केला. पोलिसांना विविध गुन्ह्यांचा तपास करताना मदतही केली. मात्र ४० वर्षांनंतरही भिल्ल वस्तीत नागरी सुविधा आणि कौटुंबिक प्रगतीचा अरुणोदय झालेला नाही. येथील कुटुंबांना अद्यापही पायाभूत सुविधांची प्रतीक्षा आहे.

पूर्वी श्रीगोंद्याची दुष्काळ तालुका अशी ओळख होती. काळाच्या ओघात सिंचन क्रांती झाल्याने तालुक्याचे चित्र बदलले. मात्र दुष्काळी भागातील बांगर्डे येथील भिल्ल वस्तीतील नागरिकांना ना जातीचे दाखले, ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड, ना बँकेचे पासबूक, ना विजेचा दिवा अशी अवस्था आहे. त्यामुळे कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ या कुटुंबांना मिळत नाही. गावागावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आरओ सिस्टिम सुरू झाल्या आहेत. मात्र भिल्ल वस्तीत साधा हातपंपही नाही.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यावर ते ऊस तोडणी करत आहेत. जंगल नष्ट झाल्याने शिकारीही बंद झाल्या. अशा परिस्थितीत येथील एकलव्य हे चोरीच्या ठिकाणी माग काढून चोर पकडून देण्यास मदत करतात. बांगर्डेच्या सरपंच अश्विनी खोटे व माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड यांच्या मदतीने या भिल्ल वस्तीतील व्यथा समोर आल्या.

-----आधार कार्ड, रेशनकार्ड नसल्याने आम्ही भारतीय नागरिक आहोत की नाही हेच समजत नाही. आम्हाला कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही, असे आम्ही काय पाप केले.

-भानुदास बर्डे,

ग्रामस्थ, बांगर्डे, ता. श्रीगोंदा

----

भिल्ल वस्तीतील नागरिकांकडे जातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांना ना घरकूल ना रस्ता देता येत. अगोदर महसूल विभागाने त्यांना दाखले द्यावेत. त्यानंतर त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होईल.

-अश्विनी खोटे,

सरपंच, बांगर्डे

----

१२ बांगर्डे

बांगर्डे येथील पालात राहणारे भिल्ल समाजातील कुटुंबीय.