शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गुंडगिरी विरूध्द राहुरीत विराट मोर्चा

By admin | Updated: August 20, 2016 01:04 IST

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात गुंडगिरी करणारांनी सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील केले आहे़ बिहार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी विराट मोर्चा काढला़ कुठलेही आवाहन न करता, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला व मोर्चेकऱ्यांना पाठींबा दर्शविला़ शेतकरी अपहरण प्रकरणातील आरोपीला अटक करण्याचे आश्वासन व अवैध व्यवसाय बंद करण्याचे संकेत दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़राहुरी येथील बालाजी मंदिरासमोर असलेल्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाल्याने नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली़ हातात फलक व भगवे ध्वज घेऊन विराट मोर्चा राहुरी शहरातून काढण्यात आला़ गुंड प्रवृत्तीविरूध्द घोषणा देत मोर्चा राहुरी तहसील कचेरीवर धडकला़मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ तहसील समोर असलेले प्रांगण कमी पडल्याने मोर्चेकऱ्यांनी झाडावर व वाहनांच्या टपावर बसून भाषणे ऐकली़ गुंड प्रवृत्तीवर वक्त्यांनी घणाघाती टीका केली़ प्रास्ताविकात राजू शेटे यांनी संभाजी उगले अपहरण प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करावी, बारागाव नांदूर येथील गुंडांचा बंदोबस्त करावा, वाळू उचलेगिरी, मटका यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी खोट्या अ‍ॅट्रॉसीटी दाखल करू नयेत अन्यथा सर्व गावकरी एकीने प्रतिकार करतील, असा इशारा दिला़ मुळा नदी पात्रात असलेला पूल उघडा पडल्याबद्दल संभाजी तनपुरे यांनी टीका केली़मोर्चेकऱ्यांना सिंधुबाई पवार, प्रतिभा जऱ्हाट, देवेंद्र लांबे, कृषिराज टकले, रवींद्र मोरे, प्रकाश देठे, मच्छिंद्र डोळकर, बाळासाहेब पवार आदींनी मार्गदर्शन केले़ उपविभागीय अधिकारी पी़ एम़ बावीस्कर यांना निवेदन देण्यात आले़मोर्चामध्ये विचारलेल्या प्रश्नांना तहसीलदार अनिल दौंडे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी उत्तरे दिली़ वाळू उचलेगिरीविरूध्द मोहीम हाती घेण्यात आली असून गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार दौंडे यांनी दिले़ आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिले़ दारू, वाळू तस्करी व मटक्याचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली़(तालुका प्रतिनिधी)राहुरीत मोर्चेकऱ्यांचा उच्चांकऊस झोन प्रश्नी ३२ वर्षापूर्वी राहुरी येथे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते़ त्यागर्दीचा उच्चांक शुक्रवारच्या मोर्चाने मोडून काढला़ हा विषय तालुक्यात चर्चेचा ठरला़ जागा कमी पडल्याने मिळेल तेथे बसून नागरिक भाषणे ऐकत होते़