शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या तक्रारी पोलीस ठाण्यात; तंटामुक्ती कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी ...

अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशातून १९ जुलै २००७ रोजी राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. गावपातळीवरील छोट्या-मोठ्या तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.

तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यासह राज्यभरात ही मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेला राज्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही वर्षांत मात्र शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. जिल्हास्तरावर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने समाजहितासाठी राबविलेली ही मोहीम सध्या कागदावरच आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील गावांचे प्रशासनाकडून मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे मोहिमेत कार्यरत असलेल्या तंटामुक्त समित्यांकडूनही पहिल्यासारखे काम होताना दिसत नाही. आता गावपातळीवरील रस्ता अडविणे, जमिनीचे वाद, बांधावरून होणारी भांडणे, झाडे तोडणे आदी कारणांवरून वाद होऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत.

..............

आदेश नाही, प्रचार प्रसिद्धीही नाही

राज्यस्तरीय समितीने दरवर्षी या मोहिमेचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करणे, मोहिमेचा प्रचार व प्रसिद्धीसाठी नियोजन करणे, मूल्यमापनाचे निकष ठरविणे आदी जबाबदाऱ्या आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र यातील काहीच कार्यवाही झालेली नाही. ज्या गावांमध्ये तंटामुक्ती समिती प्रामाणिकपणे काम करते त्यांचे मूल्यमापन न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

.........

चांगले काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहनाची गरज

..............

जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्ती समित्या कार्यरत असून, त्यांचे कामही चांगले आहे. या गावांचे प्रशासनाने मूल्यमापन करून पहिल्यासारखेच त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

.........

शासन पातळीवरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात इतर कामांची जबाबदारी असल्याने स्थानिक पातळीवरील समित्यांकडून काम झाले नाही, तसेच गावांचे मूल्यमापनही झाले नाही.

-अर्चना भाकड, तहसीलदार शेवगाव

..........

चिचोंडी पाटील येथे तंटामुक्ती समितीचे काम सुरू आहे. गावात आलेल्या अर्जांवर बैठक घेऊन स्थानिक पातळीवरच वाद सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. मोहिमेंतर्गत मात्र गावाचे प्रशासनाकडून मूल्यमापन होत नाही.

-अमित बोरा, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, चिचोंडी पाटील ता. नगर.