शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

गावच्या तक्रारी पोलीस ठाण्यात; तंटामुक्ती कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी ...

अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशातून १९ जुलै २००७ रोजी राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. गावपातळीवरील छोट्या-मोठ्या तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.

तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यासह राज्यभरात ही मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेला राज्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही वर्षांत मात्र शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. जिल्हास्तरावर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने समाजहितासाठी राबविलेली ही मोहीम सध्या कागदावरच आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील गावांचे प्रशासनाकडून मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे मोहिमेत कार्यरत असलेल्या तंटामुक्त समित्यांकडूनही पहिल्यासारखे काम होताना दिसत नाही. आता गावपातळीवरील रस्ता अडविणे, जमिनीचे वाद, बांधावरून होणारी भांडणे, झाडे तोडणे आदी कारणांवरून वाद होऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत.

..............

आदेश नाही, प्रचार प्रसिद्धीही नाही

राज्यस्तरीय समितीने दरवर्षी या मोहिमेचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करणे, मोहिमेचा प्रचार व प्रसिद्धीसाठी नियोजन करणे, मूल्यमापनाचे निकष ठरविणे आदी जबाबदाऱ्या आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र यातील काहीच कार्यवाही झालेली नाही. ज्या गावांमध्ये तंटामुक्ती समिती प्रामाणिकपणे काम करते त्यांचे मूल्यमापन न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

.........

चांगले काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहनाची गरज

..............

जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्ती समित्या कार्यरत असून, त्यांचे कामही चांगले आहे. या गावांचे प्रशासनाने मूल्यमापन करून पहिल्यासारखेच त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

.........

शासन पातळीवरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात इतर कामांची जबाबदारी असल्याने स्थानिक पातळीवरील समित्यांकडून काम झाले नाही, तसेच गावांचे मूल्यमापनही झाले नाही.

-अर्चना भाकड, तहसीलदार शेवगाव

..........

चिचोंडी पाटील येथे तंटामुक्ती समितीचे काम सुरू आहे. गावात आलेल्या अर्जांवर बैठक घेऊन स्थानिक पातळीवरच वाद सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. मोहिमेंतर्गत मात्र गावाचे प्रशासनाकडून मूल्यमापन होत नाही.

-अमित बोरा, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, चिचोंडी पाटील ता. नगर.