शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

गावच्या तक्रारी पोलीस ठाण्यात; तंटामुक्ती कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी ...

अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशातून १९ जुलै २००७ रोजी राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. गावपातळीवरील छोट्या-मोठ्या तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.

तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यासह राज्यभरात ही मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेला राज्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही वर्षांत मात्र शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. जिल्हास्तरावर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने समाजहितासाठी राबविलेली ही मोहीम सध्या कागदावरच आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील गावांचे प्रशासनाकडून मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे मोहिमेत कार्यरत असलेल्या तंटामुक्त समित्यांकडूनही पहिल्यासारखे काम होताना दिसत नाही. आता गावपातळीवरील रस्ता अडविणे, जमिनीचे वाद, बांधावरून होणारी भांडणे, झाडे तोडणे आदी कारणांवरून वाद होऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत.

..............

आदेश नाही, प्रचार प्रसिद्धीही नाही

राज्यस्तरीय समितीने दरवर्षी या मोहिमेचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करणे, मोहिमेचा प्रचार व प्रसिद्धीसाठी नियोजन करणे, मूल्यमापनाचे निकष ठरविणे आदी जबाबदाऱ्या आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र यातील काहीच कार्यवाही झालेली नाही. ज्या गावांमध्ये तंटामुक्ती समिती प्रामाणिकपणे काम करते त्यांचे मूल्यमापन न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

.........

चांगले काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहनाची गरज

..............

जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्ती समित्या कार्यरत असून, त्यांचे कामही चांगले आहे. या गावांचे प्रशासनाने मूल्यमापन करून पहिल्यासारखेच त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

.........

शासन पातळीवरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात इतर कामांची जबाबदारी असल्याने स्थानिक पातळीवरील समित्यांकडून काम झाले नाही, तसेच गावांचे मूल्यमापनही झाले नाही.

-अर्चना भाकड, तहसीलदार शेवगाव

..........

चिचोंडी पाटील येथे तंटामुक्ती समितीचे काम सुरू आहे. गावात आलेल्या अर्जांवर बैठक घेऊन स्थानिक पातळीवरच वाद सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. मोहिमेंतर्गत मात्र गावाचे प्रशासनाकडून मूल्यमापन होत नाही.

-अमित बोरा, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, चिचोंडी पाटील ता. नगर.