शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘दिल की बात’ समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 14:15 IST

शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल,

शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल, असा सल्ला देत सध्या भाजपा व संघावाले मेक इन इंडियाच्या नावाखाली देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाले़ यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोपस, खासदार रजनी पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, माजी मंत्री वर्षा गायकवाड, आमदार अमिता चव्हाण, आमदार निर्मला गावीत, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री शोभा बच्छाव, कमलताई व्यवहारे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह राज्यातील महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात थोरात गटाची मात्र अनुपस्थिती जाणवली़भाजपा सरकार देशात भितीचे वातावरण निर्माण करून आपली वोट बँक निर्माण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला़ भाजपा सरकार बकवास असून गरिबांचे व विद्यार्थ्यांचा आवाज चिरडून टाकणाऱ्या या सरकार विरोधात एकत्रित रान उठवावे लागेल़ पुढील वर्षी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्रित तयारीला लागावे. त्यासाठी पक्षाचे जनसंपर्क अभियान गावपातळीवर नेवून सामान्य लोकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले़ देशाला आज मेक इन इंडिया नव्हे तर लव्ह इंडियाची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, रजनी पाटील यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केले़ (तालुका प्रतिनिधी)विखे यांनी सरकारचे अपयश व नाकर्तेपणा राज्याला अधोगतीकडे नेत असल्याचा व जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करीत काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या समजावून घेऊन काम करण्याचा सल्ला दिला़ सरकारकडून घोषणांचा पाऊस सुरू असून काँग्रेसला पर्याय निर्माण होऊ शकत नाही़ काँग्रेसच अच्छे दिन आणू शकते, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला़