शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

मोबाइल नेटवर्कअभावी आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

राजूर : मोबाइल नेटवर्किंग नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कुमशेत येथील सुमारे ८० हून अधिक विद्यार्थ्यांना ...

राजूर : मोबाइल नेटवर्किंग नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कुमशेत येथील सुमारे ८० हून अधिक विद्यार्थ्यांना जिकडेतिकडे गवत आणि झाडेझुडपे वाढलेल्या आणि पावसाने ओल्याचिंब झालेल्या डोंगरवाटा तुडविण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभाग अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी शेतकरी पालकांनी पदरमोड करत मुलाला अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. मोबाइल मुलांच्या हातात मिळाला. आता आपला अभ्यास सुरू होणार, या आनंदात असणाऱ्या मुलांचा आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये मोबाइल नेटवर्किंग उपलब्ध नसल्याने हिरमोड तर झालाच; पण याबरोबरच डोंगरवाटा झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे शिक्षण या विद्यार्थ्यांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा झाले आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून दूर असणाऱ्या डोंगराचा किंवा टेकडीचा आधार घ्यावा लागत आहे.

भर उन्हाळ्यात डोंगरावरील झाडाखाली बसून ही मुले शिक्षण प्रणाली आत्मसात करत होती. मात्र, आता पावसाळा सुरू झाला आहे. या पट्ट्यात पावसाचे प्रमाणही अधिक असते. डोंगररांगा आणि टेकड्यांवर हिरवेगार गवत व झुडपे यांची झपाट्याने वाढ होत आहे. ओढे, नाले प्रवाही होत आहेत. अशा परिस्थितीत या झाडाझुडुपांतून वाट शोधत ही मुले गावापासून दूर पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्या आणि डोंगर वाटा तुडवत आहेत. त्यातच या पायवाटाही आता ओल्याचिंब झाल्या आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही आता वाढणार आहे. अशाही परिस्थितीत कुमशेत येथील पाचवीपासून ते महाविद्यालयालयीन मुले समूह करून टेकड्यांवर जात आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहेत.

---------

शासनाने ऑनलाइन शिक्षणाची जी प्रणाली सुरू केली ती आमच्यासाठी अडचणीची ठरत आहे. आदिवासी भागातील भौगोलिक स्थिती शहरी भागांच्या तुलनेत भिन्न आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाइलला नेटवर्क नाही. आता पावसाळ्यात सगळीकडे पाऊस पडत आहे, अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणापासून मुले वंचित राहणार आहेत.

- सयाजी असवले, सरपंच, कुमशेत

-----------

आमचे शिक्षण पूर्ण होणार का?

सकाळी उठून दररोज डोंगरावर जायचे, तेथेही रेंज मिळविण्यासाठी इकडेतिकडे फिरायचे, दोन तास फिरले तर अर्धा तास रेंज मिळते तोपर्यंत दोन तीन मुद्दे निघून जातात. तेव्हा आमचे शिक्षण पूर्ण होणार का, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला असल्याचे महाविद्यालयात अखेरच्या वर्गात शिकत असलेल्या मनीषा असवले हिने सांगितले.