शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल नेटवर्कअभावी आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

राजूर : मोबाइल नेटवर्किंग नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कुमशेत येथील सुमारे ८० हून अधिक विद्यार्थ्यांना ...

राजूर : मोबाइल नेटवर्किंग नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कुमशेत येथील सुमारे ८० हून अधिक विद्यार्थ्यांना जिकडेतिकडे गवत आणि झाडेझुडपे वाढलेल्या आणि पावसाने ओल्याचिंब झालेल्या डोंगरवाटा तुडविण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभाग अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी शेतकरी पालकांनी पदरमोड करत मुलाला अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. मोबाइल मुलांच्या हातात मिळाला. आता आपला अभ्यास सुरू होणार, या आनंदात असणाऱ्या मुलांचा आदिवासी पट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये मोबाइल नेटवर्किंग उपलब्ध नसल्याने हिरमोड तर झालाच; पण याबरोबरच डोंगरवाटा झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे शिक्षण या विद्यार्थ्यांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा झाले आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून दूर असणाऱ्या डोंगराचा किंवा टेकडीचा आधार घ्यावा लागत आहे.

भर उन्हाळ्यात डोंगरावरील झाडाखाली बसून ही मुले शिक्षण प्रणाली आत्मसात करत होती. मात्र, आता पावसाळा सुरू झाला आहे. या पट्ट्यात पावसाचे प्रमाणही अधिक असते. डोंगररांगा आणि टेकड्यांवर हिरवेगार गवत व झुडपे यांची झपाट्याने वाढ होत आहे. ओढे, नाले प्रवाही होत आहेत. अशा परिस्थितीत या झाडाझुडुपांतून वाट शोधत ही मुले गावापासून दूर पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्या आणि डोंगर वाटा तुडवत आहेत. त्यातच या पायवाटाही आता ओल्याचिंब झाल्या आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही आता वाढणार आहे. अशाही परिस्थितीत कुमशेत येथील पाचवीपासून ते महाविद्यालयालयीन मुले समूह करून टेकड्यांवर जात आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहेत.

---------

शासनाने ऑनलाइन शिक्षणाची जी प्रणाली सुरू केली ती आमच्यासाठी अडचणीची ठरत आहे. आदिवासी भागातील भौगोलिक स्थिती शहरी भागांच्या तुलनेत भिन्न आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाइलला नेटवर्क नाही. आता पावसाळ्यात सगळीकडे पाऊस पडत आहे, अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणापासून मुले वंचित राहणार आहेत.

- सयाजी असवले, सरपंच, कुमशेत

-----------

आमचे शिक्षण पूर्ण होणार का?

सकाळी उठून दररोज डोंगरावर जायचे, तेथेही रेंज मिळविण्यासाठी इकडेतिकडे फिरायचे, दोन तास फिरले तर अर्धा तास रेंज मिळते तोपर्यंत दोन तीन मुद्दे निघून जातात. तेव्हा आमचे शिक्षण पूर्ण होणार का, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला असल्याचे महाविद्यालयात अखेरच्या वर्गात शिकत असलेल्या मनीषा असवले हिने सांगितले.