शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदलीचा तिढा वाढला

By admin | Updated: August 30, 2014 23:20 IST

अहमदनगर : आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा तिढा वाढला आहे. ३० सप्टेंबर नंतर होणाऱ्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केली.

अहमदनगर : आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा तिढा वाढला आहे. ३० सप्टेंबर नंतर होणाऱ्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केली. यामुळे महिनाभराने शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने आता अतिरिक्त शिक्षकांना का जिल्ह्यात समावून घेता, या विषयी शिक्षण विभागात खल सुरू आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची भेट घेत हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे.जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदलीचा विषय गाजत आहे. सुरूवातीला शिक्षकांपूर्ता मर्यादीत राहिलेल्या या विषयात आता सामाजिक संघटनांनी उडी घेतली आहे. काहींना जिल्ह्यात पदोन्नती आणि समायोजनाने रिक्त होणाऱ्या जागा सरळसेवेने भराव्यात, तर काही जिल्हा परिषद सदस्यांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना समावून घेण्याचा आग्रह आहे. शिक्षकांच्या बदलीच्या कायद्यानुसार जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या जागा या एकतर सरळसेवा भरतीने अथवा आंतरजिल्हा बदली यापैकी कोणत्याही एका पर्यायाने भरण्याचे निर्देश आहेत. मात्र, यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. सुमारे २० दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत रिक्त जागांवर प्राधान्याने आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीच्या नावाने जिल्हा परिषदेत बऱ्याच घडामोडी सुरू असल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी देखील प्रकरणी सावध भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष लंघे, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे आणि काही सदस्यांची जिल्हा परिषदेत या विषयांवर बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली. त्यानंतर लवकर याबाबत अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.आंतरजिल्हा शिक्षकांचे शिष्टमंडळ लंघे यांना भेटले असून त्यांनी तातडीने हा विषय संपविण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)३० सप्टेंबर नंतर पटसंख्या निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यात सुमारे २५० शिक्षक अतिरिक्त होण्याची भिती आहे. यामुळे आत्ताच आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेतल्यास महिनाभरानंतर गुणवत्ताधारक शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जाण्याची भीती शिक्षण विभागातून व्यक्त होत आहे.