शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

कुपोषणमुक्तीच्या उंबरठ्यावर!

By admin | Updated: September 20, 2014 23:22 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीचा आलेख वाढत आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीचा आलेख वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्हा ९४ टक्के कुपोषण मुक्त झाला असून लोकसहभागातून जिल्ह्यात ८३ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची २ हजार ८४९ बालके असून त्यांच्या वर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे.जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने शाश्वत कुपोषणमुक्तीसाठी १५ कलमी किलबिल प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण दोन महिन्यापासून हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्यात होम बेस सीडीसी, डिजीटल अंगणवाडी, गोपाल पंगत, मोबाईल अंगणवाडी, कुपोषण निर्मूलनाची गुढी, आईसी आणि प्री- अंगणवाडी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा यश येत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार आॅक्टोबर २०११ मध्ये ८८.३९ टक्के सर्वसाधारण श्रेणीतील, १०.३९ टक्के मध्यम वजनाची आणि तीव्र कमी वजनाची १.२३ टक्के बालके होती. त्याचे प्रमाण आॅक्टोबर २०१२ मध्ये साधारण वजनाची ९३.२२ टक्के, मध्यम वजनाची ५.९५ आणि तीव्र कमी वजनाची ०.८३ टक्के बालके होती. त्याचे प्रमाण आॅगस्ट २०१४ मध्ये ९४ टक्के, मध्यम वजनाची ४.७४ आणि तीव्र कमी वजनाची ०.७९ टक्के बालके आहेत.जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींमध्ये आढळलेले रक्ताक्षयाचे प्रमाण ५२ टक्क्यांहून २६ टक्के पर्यंत खाली आणण्यात महिला बालकल्याण विभागाने यश मिळविलेले आहे. नवविवाहीतांचे समुपदेशन, मोहर प्रकल्प, सक्षम माता सभा यांच्या माध्यमातून जन्मता कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण २० टक्क्यांहून १० टक्क्यापर्यंत खाली आणण्यात यश मिळविले आहे.जिल्ह्यात शून्य ते सहा वर्षाच्या ३ लाख ६१ हजार बालकांचे वजन घेण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात साधारण श्रेणीत ३ लाख ४१ हजार ४६५ बालके आहेत. मध्यम वजनाची १७ हजार १२९ बालके आहेत. तीव्र कमी वजनाची २ हजार ८४९ बालके आहेत.जिल्ह्यातील मातांच्या सक्षमीकरण, माता सभा, गरोदर अवस्थेत कोणता आहार दिला जावा याची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेने या कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केल्याने हा फरक दिसत आहे. हिमोग्लोबीन तपासणीत ज्या महिलांचे एचबी कमी आढळले त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. याचा परिपाक हा आहे.- अशोक पावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण