शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

तीन वर्ष झाले, सरकार मला फसवतेय- गांधींच्या समाधीस्थळावरुन हजारे यांचा व्हिडीओ प्रसारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:56 IST

लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत.

अहमदनगर : तीन वर्ष झाली भाजप सरकार सत्तेत येऊऩ पण त्यांनी भ्रष्टाचार संपविण्यासाठी एकही निर्णय घेतला नाही. लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत. म्हणून मी गांधीजींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करीत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टीका केली.दिल्ली येथील राजघाटावर गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर हजारे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे़ त्यात ते म्हणतात, काँगे्रसने संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकपाल कायदा संमत केला़ त्यावेळी भाजप विरोधात होते़ आता तुम्ही सत्तेत आहाता़ त्याला तीन वर्ष झाली़ मी तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत़ पण अद्याप लोकपालचे स्वप्न सत्यात उतरले नाही़ तीन वर्ष झाले तुम्ही सत्तेत येऊन, मी प्रयत्न करतोय, पण तुम्ही प्रतिसाद देत नाहीत़ तुम्ही पंतप्रधान झाले त्यावेळी संसदेच्या पायºयांवर माथा टेकवून या पवित्र मंदिराचे पावित्र्य राखण्याचे घोषित केले होते़ पण आता तीन वर्षांनंतरही लोकपाल, लोकआयुक्त कायद्याची अंमलबजावणी केली नाही़ संसदेत तुम्ही लोकपाल कायदा अंमलात आणण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ वर्ग एक, दोन, तीन व चार गटातील अधिकारी, कर्मचारी लोकपाल, लोकआयुक्तांच्या अंमलात आणण्याचे तुम्ही आश्वासन दिले होते़ पण ते वचन तुम्ही पाळले नाही़ श्रीरामचंद्र म्हणतात, प्राण जाए पर वचन ना जाए़ पण तुम्ही तर वचनच मोडून काढीत आहात़ तर मग आम्ही का राम म्हणायचे, असा सवाल हजारे यांनी उपस्थित केला आहे़तुम्ही फक्त जनतेला संकल्प करण्याचे आदेश देत आहेत़ जनतेने संकल्प करुन काय होणार आहे? जनतेला अधिकार मिळायला हवेत़ देशात सध्या जी परिस्थिती आहेत, ती सहन होत नाही़ म्हणून मीच आत्मक्ल्लेश करीत आहे़ शेतकरी सुखी व्हावा, असे गांधींजीचे स्वप्न होते़ पण शेतकºयांचे आज खूप हाल होत आहेत़ शेतकºयांच्या जीवावर व्यापारी श्रीमंत झाले आहेत़ सरकार स्वामीनाथन आयोगाबाबत निर्णय घेत नाही़ त्यांच्या दप्तरात स्वामीनाथन आयोगाची फाईल बंद झाली आहे, अशा शब्दात हजारे यांनी सरकारवर टीका केली.