शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

आघाडीतील तिन्ही पक्ष कायमचे एकत्र नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:21 IST

अहमदनगर : राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. ...

अहमदनगर : राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही. तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे, तोपर्यंत आघाडी कायम राहील. मात्र, यात मतभेद निर्माण होतील, असे कोणी वागू आणि बोलू नये, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या राज्यातील महाविकास आघाडीत वाझे प्रकरण, रश्मी शुल्का, परमबीर सिंग प्रकरणावरून अस्वस्थता आहे. याबाबत आघाडीतील नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना मुश्रिफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व आहे. अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, असे खुद्द ठाकरे यांनीच सांगितले. आम्ही अनुभवी मंत्र्यांना सल्ला देऊच, पण तो ऐकायचा की नाही, कशाच्या आधारे आपले मत बनवायचे, हा त्यांचाच अधिकार असेल. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या अफवा आहेत. भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया देऊन संभ्रम निर्माण करीत आहेत. पोलीस दलातील फौजदार पदावर कार्यरत एखाद्या अधिकाऱ्याचे कारनामे उघड झाले, म्हणजे लगेच सरकार अडचणीत आले असे नसते. सचिन वाझे यांना महागड्या गाड्या घ्या, ऐशोआराम करा, असे सरकारने त्यांना थोडेच सांगितलेय, असा सवाल मुश्रिफ यांनी केला. एखाद्या डॅशिंग अधिकाऱ्याला शाबासकी देणे म्हणजे त्याला गैरकृत्य करण्यास सवलत देणे नाही. पोलीस अधिकाऱ्यांना वर्दीचा अभिमान असावा. वर्दीचा उपयोग समाजासाठी करता आला पाहिजे. त्या आडून गैरकृत्य करता कामा नये. मात्र, याचाच त्यांना विसर पडल्याचे दिसते. आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला आहे. आमचीही इच्छा आहे की, या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागावा. ती स्फोटके कोणी ठेवली, कशासाठी ठेवली, याचा मास्टरमाइंड कोण हे सत्य बाहेर आले पाहिजे, अशी अपेक्षा मुश्रिफ यांनी व्यक्त केली.

परबीर सिंग प्रकरणाबाबत मुश्रिफ म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भाजप माफीचा साक्षीदार बनवू पाहत आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण आणि दूरचित्रवाणी माध्यमांचा टीआरपी घोटाळा प्रकरण याचा तपास परमबीर सिंग यांनी उत्साहाने केला. त्यामध्ये अर्णब गोस्वामी अडचणीत आले. तेव्हा परमबीर सिंग भाजपच्या रडारवर होते. त्यानंतर, वाझे प्रकरण घडले. त्याचे धागेदोरे थेट परमबीर सिंग यांच्यापर्यंत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. तेथे त्यांनी भेटीगाठी घेतल्या आणि नंतर परमबीर सिंगांचे ते पत्र समोर आले. हा घटनाक्रम पाहिला, तर भाजप त्यांना माफीचा साक्षीदार करून यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग आणि अपक्ष आमदारांना भाजपमध्ये येण्यास सांगणे हे प्रकारही गंभीर आहेत. त्यामुळे या सर्वांचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मुश्रिफ म्हणाले.