शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

तीस मंत्र्यांना जेलची हवा

By admin | Updated: July 7, 2014 00:35 IST

अहमदनगर : राज्यात शिवसेना-भाजपाची युती अभेद्य राहणार असून, ज्या मतदारसंघात युतीचा उमेदवार कधीच निवडून आला नाही त्या जागेत अदला-बदल होणार

अहमदनगर : राज्यात शिवसेना-भाजपाची युती अभेद्य राहणार असून, ज्या मतदारसंघात युतीचा उमेदवार कधीच निवडून आला नाही त्या जागेत अदला-बदल होणार असल्याचे सांगून श्रीगोंदा मतदारसंघ शिवसेनेकडे येण्याचे संकेत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले. तसेच युतीची सत्ता आल्यास विद्यमान ४० पैकी ३० मंत्र्यांना जेलची हवा खायला लावणार असा इशारा कदम यांनी दिला.आगामी विधानसभा निवडणूक मार्गदर्शन मेळाव्याचे सारोळाबद्दी (ता.नगर) येथे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख सुहास सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे, पं.स. सदस्य संदेश कार्ले, जि.प. सदस्य दत्तात्रय सदाफुले, पोपट निमसे, विश्वास जाधव, शंकर ढगे, सुजाता कदम, योगीराज गाडे, घन:श्याम म्हस्के, रावसाहेब म्हस्के उपस्थित होते. यावेळी कदम म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र विकायला काढला पण आता विधानसभेवर भगवाच फडकणार. आपल्याकडे गृह खाते घेणार. ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात करोडो रुपयांचा घोटाळा केला अशा ४० पैकी ३० मंत्र्यांना जेलची हवा खाण्यास पाठविणार. पहिला अजित पवार यांचा सिंचन घोटाळा बाहेर काढणार. नंतर नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यापासून सुरुवात करणार. ज्या मंत्र्यांनी साखर कारखान्यामधून शेतकऱ्यांची लूटमार केली त्यांचा सुद्धा बेत पाहणार. शिवसेनेबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्या सर्वांना लोकसभेत पराभूत होण्याची वेळ आली आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजार मतदारांची नाव नोंदणी करा. प्रत्येक गावात, घरात, गाव तेथे शिवसेना शाखा उभारा असे यावेळी ते म्हणाले.यावेळी सामंत म्हणाले, राष्ट्रवादी पैशाच्या जोरावर उड्या मारत आहे. पण आता लोकसभेत त्यांच्या पैशाचे पानीपत झाले. तर विधानसभेमध्ये यांची मस्ती उतरवणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघ हा शिवसेनेलाच घेणार असल्याचे सांगून या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांची नाव नोंदणी करा. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. श्रीगोंदा मतदारसंघ शिवसेनेला दिला तर उमेदवार विजयीच करून दाखवू असे यावेळी सामंत म्हणाले. यावेळी टाकळी काझी, सारोळाबद्दी, भातोडी, निंबोडी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)मतदारच पांडुरंगबबनराव पाचपुते यांनी दुष्काळी परिस्थितीत पंढरीची वारी करण्यापेक्षा मतदारसंघाची वारी केली तर तुम्हाला त्यांच्यातच पांडुरंग दिसेल असा टोला कदम यांनी पाचपुतेंवर मारला.