शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

शिर्डीबाबतचे ‘ते’ दु:ख कायम

By admin | Updated: April 22, 2016 00:20 IST

कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही,

कोपरगाव : या भागातील नेत्यांच्या प्रचाराला मी नेहमी येत होतो़ आमच्या लोकांनी त्यांना निवडूनही दिलं़ मात्र माझ्यावेळी अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा प्रचार केला गेला़ मी जरी पडलो, तरी काम थांबवले नाही, आजही खासदार आहे़ पण शिर्डीचा खासदार झालो असतो तर आणखी चांगले काम केले असते़ शिर्डीचा खासदार झालो नाही, याचे दु:ख कायम राहिल, अशी खंत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली़‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियानांतर्गत कन्याकुमारी ते महू (मध्यप्रदेश) अशी भीम रथ यात्रा खासदार आठवले यांनी काढली़ या यात्रेचे कोपरगावमध्ये स्वागत करण्यात आले़ यावेळी झालेल्या जाहीर सभेत खा़ आठवले बोलत होते़ अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते़ नगराध्यक्ष रविंद्र पाठक, संजय सातभाई, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, तानसेन नन्नवरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शहराध्यक्ष रावसाहेब साठे, नगरसेविका उज्ज्वला रणशूर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती़बिपीन कोल्हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आठवले यांनी जाती तोडो, समाज जोडो अभियान राबवून यात्रा काढली़ त्यामुळे समाजात वैचारिक क्रांती होणार आहे़ डॉ़ बाबासाहेबांचे विचार घेवुन काढलेली ही यात्रा निश्चित सफल होईल़आठवले पुढे म्हणाले, लोकशाहीत कोणत्या पक्षात जायचे, याचा अधिकार आम्हाला आहे़ भाजप सोबत जावुन आम्ही काही पाप केलं नाही़ पूर्वी शरद पवारांना मदत केली़ त्यांनी काही दिलं नाही, म्हणून सेना-भाजप बरोबर गेलो़ लोकसभेत राज्यात ४८ पैकी ४२ जागा निवडून आल्या़ विधानसभेत भाजपाबरोबर राहिलो़ त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले़ ते चांगले काम करीत आहेत़ त्यांनी दुष्काळग्रस्त भागाला न्याय द्यावा, पाणी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आठवले म्हणाले, संविधान बदलणार, असा खोटा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध केला जात आहे़ संविधानाला कुणी हात लावु शकत नाही, आणि लावला तर त्याचा सत्यानाश झाल्याश्विाय राहणार नाही़ (प्रतिनिधी)माझ्या पायाला जरी आला फोड...कन्याकुमारीपासून निघालेल्या यात्रेमुळे खा़ आठवलेंच्या पायाला फोड आले, असे बिपीन कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले, त्याचा धागा पकडून आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता म्हणून दाखविली़‘‘माझ्या पायाला आले असले जरी फोडतरी मी सोडणार नाही समतेचा रोड’’कारण मला आहे साऱ्या जातीच्या लोकांनाएकत्र करण्याची खोड’’ म्हणूनच लोक म्हणतात, आठवले साहेब आहेत फार गोड़’’