शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वृद्धेश्वरकडे नोंदणी झालेल्या उसाचे टिपरूही राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST

तिसगाव : नैमित्तिक कामांच्या व्यतिरिक्त कोणताही व्यत्यय यंदाच्या गळीत हंगामात आला नाही. अडीच हजार मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता ...

तिसगाव : नैमित्तिक कामांच्या व्यतिरिक्त कोणताही व्यत्यय यंदाच्या गळीत हंगामात आला नाही. अडीच हजार मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता असतानाही तीन हजारांपर्यंत प्रतिदिन सरासरी गाळप व वेगाचे सातत्य राहिले. १२१ दिवसांच्या गाळप हंगामात तीन लाख ऐंशी हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन सुमारे चार लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. वृद्धेश्वरच्या कार्यक्षेत्रात नोंदणी झालेल्या उसाचे टिपरूही शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही कारखाना अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी शेतकऱ्यांना दिली.

‘लोकमत’ प्रतिनिधीने राजळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

नगदी पीक म्हणून उसाला बँकांचे मिळणारे अर्थसहाय्य, दोन वर्षांपासूनचे अनुकूल पर्जन्यमान यामुळे शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देत आहे. आडसाली, पूर्वहंगामी उसाची आवश्यकता कारखान्यास गरजेची असते. ती अपेक्षेप्रमाणे झाली नाही. डिसेंबर २०१९ मध्ये विक्रमी ऊस लागवड झाली. या एकाच महिन्यातील लागवड झालेल्या उसापासून सव्वादोन लाखांच्यावर टनेज अपेक्षित आहे. गाळप क्षमता विचारात घेता मार्च अखेर ८५ दिवसात हा ऊस गाळप होणे अपेक्षित आहे, असे राजळे यांनी सांगितले.

उपाध्यक्ष रामकिसन काकडे म्हणाले, कासार पिंपळगाव, चितळी, टाकळीमानूर गटात ऊस लागवड चांगली आहे. तुलनेत पाथर्डी, मिरी, करंजी गटात कमी आहे. जानेवारी २०२० नंतर लागवड झालेले ऊस क्षेत्र अल्प असून यापासून किमान ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. एप्रिलच्या मध्यापर्यंत शेष ऊस गाळपाचे नियोजन संचालक मंडळ, कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

--

काही अडचणी असल्यास तक्रार करा

तोडणीसह वाहतूक यंत्रणेच्या वास्तव त्रुटी व आर्थिक मागणी संदर्भाने ऊस उत्पादकांनी लेखी तक्रारी कराव्यात. सत्यता पडताळून कठोर कारवाई करू, असे कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी सांगितले.