शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

विशेष मोहिमेकडे मतदारांची पाठ !

By admin | Updated: June 29, 2014 00:27 IST

अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे मतदारांनी पाठ फिरवली आहे.

अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे मतदारांनी पाठ फिरवली आहे. वीस दिवसांत अवघ्या ७ हजार ७३० जणांनीच नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नवमतदार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी नाव नसल्याच्या तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांनी या नावनोंदणी मोहिमेकडे कानाडोळा केला आहे, हे विशेष.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नावनोंदणी केली जात आहे. याच बरोबर नाव वगळणी, स्थलांतरीत, नावातील त्रुटींसंदर्भात अर्ज भरून घेतले जात आहेत. दि. ९ ते ३० जूनदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. २८ व २९ जून रोजी प्रत्येक मतदान केंद्रांवर बीएलओ उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ३ हजार ५३७ मतदान केंद्र आहेत. तेथे आज सकाळपासून नावनोंदणी केली जात आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.दि. १ जानेवारी २०१४ रोजी ज्या तरूणांना १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांची नावनोंदणी केली जात आहे. यादीत नाव नाही, निवडणूक ओळखपत्र आहे, परंतु मतदारयादीत नाव नाही, त्यांना या मोहिमेत नावनोंदणी करता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित ही नोंदणी सुरू आहे.मतदारांच्या सोयीसाठी १८००२३३३०३३ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. (प्रतिनिधी)अर्जांचे प्रकारमोहिमेत ७ हजार ७३० नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नमुना ६ अ अर्जात नाव समाविष्ट करणे, नमुना ७ नाव वगळणे, नमुना ८ वय, लिंग, नाव दुरूस्ती करणे, ८ अ विधानसभा मतदारसंघात स्थलांतराबाबत आहे. वर्षभरात ही दुसरी मोहीम आहे. कॉलेजमध्ये शिबिरांचे आयोजन केले. बहुतांशी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर १ हजार पुरूषांमागे ९३९ आहे. मतदारयादीत हे प्रमाण ८९८ आहे. जिल्ह्यात ९ हजार बचत गट आहेत. त्यातील महिलांची नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात १२ हजार ७३८ टपाली मतदार आहेत. त्यांना यापुढे सेवेच्या ठिकाणी मतदारनोंदणी करता येईल. जिल्ह्यात पुनर्रिक्षणात १ लाख ४६ हजार मतदारांची दुबार नावे वगळली आहेत.-सुनील माळी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी