शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

तहसीलदारांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

अहमदनगर : उपसरपंचावरील अविश्वास ठरावाचा श्रीगोंदा तहसीलदारांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवला असल्याने तहसीलदारांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीगोंदा ...

अहमदनगर : उपसरपंचावरील अविश्वास ठरावाचा श्रीगोंदा तहसीलदारांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवला असल्याने तहसीलदारांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील उपसरपंच राजेंद्र अप्पासाहेब मोटे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोटे यांच्या बाजूने निर्णय देत तहसीलदारांचा निर्णय रद्द ठरविला. २०१७ ते २०२२ या कालावधीत पारगाव सुुद्रिक ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन अर्जदार मोटे हे सदस्य म्हणून निवडून आले. ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या १६ असून सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली, तर अर्जदार मोटे यांची निवड सदस्यांमधून उपसरपंचपदी झाली. पुढे राजकीय वैमनस्यातून इतर सदस्यांनी मोटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्यावर चर्चा करण्यासाठी तत्कालीन श्रीगोंदा तहसीलदारांनी ३ सप्टेंबर २०२० रोजी विशेष सभेचे आयोजन केले. सभेला १६ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या बाजूने ११ तर ठरावाच्या विरोधात २ सदस्यांनी मतदान केले. तहसीलदारांनी एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केला.

त्यावर उपसरपंच मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. मोटे यांच्या बाजूने ॲड. योगेश गेरंगे यांनी बाजू मांडताना सांगितले की, सरपंचपद हे थेट जनतेतून निवडून आले असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सुधारित कलम ३५ (३)मध्ये एखाद्यावर अविश्वास आणायचा असेल तर सदस्यसंख्येच्या तीन चतुर्थांस बहुमत गरजेचे आहे. परंतु, श्रीगोंदा तहसीलदारांनी संबंधित ठराव चुकीच्या पद्धतीने दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केला. त्यामुळे तो रद्द व्हावा. हा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मोेटे यांचा अर्ज मंजूर करत त्यांच्यावरील पारित झालेला अविश्वास ठराव रद्दबातल ठरविला.

-----------

तहसीलदारांचे अज्ञान?

ग्रामपंचायत अधिनियमात अविश्वास ठरावावर निकाल देताना कलम ३५ (३) प्रमाणे सुधारणा केलेली आहे. त्या सुधारित नियमानुसार अविश्वास ठरावासाठी तीन चतुर्थांस बहुमत लागते. कायद्यात याची स्पष्ट तरतूद असतानाही तहसीलदारांनी संबंधित ठराव दोन तृतीयांश बहुमताने कसा मंजूर केला, हा प्रश्न या निकालाच्या निमित्ताने समोर आला आहे. यातून तहसीलदारांच्या अज्ञानावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसते.