शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर घटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST

अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद तसेच गुरूमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांनी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या सहविचार ...

अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद तसेच गुरूमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांनी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या सहविचार सभेत सभासदांचा ही मागणी मान्य करीत १६ मार्चपासून बँकेचे व्याजदर घटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजू राहणे यांनी दिली.

येत्या १६ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, बँकेने जामीन कर्जावरील व्याजदर ०.४० टक्के कमी करून ९ .९० वरून ९.५० टक्के केला आहे. तसेच शैक्षणिक कर्ज, गृहबांधणी-गृहखरेदी, गृहतारण व वाहनखरेदी या सर्व कर्जावरील व्याजदर ९ टक्के केला आहे. बुधवारी शिक्षक बँकेत आर. टी. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत हा निर्णय घेतल्याचे राहणे म्हणाले. यावेळी जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, माजी अध्यक्ष गोकुळ कळमकर, किसन वराट, बाळासाहेब सरोदे, संदीप मोटे, नारायण पिसे, मच्छिंद्र लोखंडे, विठ्ठलराव फुंदे, बाळासाहेब तापकीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्युल्लता आढाव, महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख अंजली मुळे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्तापाटील कुलट, मोहनराव पागिरे, बाळासाहेब चाबुकस्वार, माजी अध्यक्ष संतोष दुसंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मुखेकर, उषाताई बनकर, संचालक सलीमखान पठाण, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाबा खरात, अर्जुन शिरसाट, सुयोग पवार, अनिल भवार, उत्तर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे, भाऊराव राहिंज, पी. डी. सोनवणे, आबा दळवी, राम वाकचौरे, रामेश्वर चोपडे, प्रदीप राहाणे, कैलास निकम, संतोष मगर आदी उपस्थित होते.

..............

बँकेने ओलांडला साडेअकराशे कोटींचा टप्पा

निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी स्वागत केले असून, गेल्या अनेक वर्षांपासून इतक्या कमी मार्जिनमध्ये बँक चालवण्याचा विक्रम या संचालक मंडळाने केला आहे. गुरुमाउली मंडळ सत्तेवर आल्यापासून कर्जाचा व्याज दर सातत्याने कमी केला आहे. सत्तेवर येऊन कर्ज दर न वाढवता व्याजदर कमी करणारे विद्यमान संचालक मंडळ एकमेव आहे. या मंडळाच्या नेतृत्वाखाली कायम ठेवीवर सातत्याने वाढता व्याजदर मिळालेला असून, लाभांश वाढताच दिला आहे. संचालकांच्या विश्वासावरच बँकेने साडेअकराशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.