शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर घटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST

अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद तसेच गुरूमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांनी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या सहविचार ...

अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद तसेच गुरूमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांनी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या सहविचार सभेत सभासदांचा ही मागणी मान्य करीत १६ मार्चपासून बँकेचे व्याजदर घटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजू राहणे यांनी दिली.

येत्या १६ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, बँकेने जामीन कर्जावरील व्याजदर ०.४० टक्के कमी करून ९ .९० वरून ९.५० टक्के केला आहे. तसेच शैक्षणिक कर्ज, गृहबांधणी-गृहखरेदी, गृहतारण व वाहनखरेदी या सर्व कर्जावरील व्याजदर ९ टक्के केला आहे. बुधवारी शिक्षक बँकेत आर. टी. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत हा निर्णय घेतल्याचे राहणे म्हणाले. यावेळी जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, माजी अध्यक्ष गोकुळ कळमकर, किसन वराट, बाळासाहेब सरोदे, संदीप मोटे, नारायण पिसे, मच्छिंद्र लोखंडे, विठ्ठलराव फुंदे, बाळासाहेब तापकीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्युल्लता आढाव, महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख अंजली मुळे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्तापाटील कुलट, मोहनराव पागिरे, बाळासाहेब चाबुकस्वार, माजी अध्यक्ष संतोष दुसंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मुखेकर, उषाताई बनकर, संचालक सलीमखान पठाण, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाबा खरात, अर्जुन शिरसाट, सुयोग पवार, अनिल भवार, उत्तर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे, भाऊराव राहिंज, पी. डी. सोनवणे, आबा दळवी, राम वाकचौरे, रामेश्वर चोपडे, प्रदीप राहाणे, कैलास निकम, संतोष मगर आदी उपस्थित होते.

..............

बँकेने ओलांडला साडेअकराशे कोटींचा टप्पा

निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी स्वागत केले असून, गेल्या अनेक वर्षांपासून इतक्या कमी मार्जिनमध्ये बँक चालवण्याचा विक्रम या संचालक मंडळाने केला आहे. गुरुमाउली मंडळ सत्तेवर आल्यापासून कर्जाचा व्याज दर सातत्याने कमी केला आहे. सत्तेवर येऊन कर्ज दर न वाढवता व्याजदर कमी करणारे विद्यमान संचालक मंडळ एकमेव आहे. या मंडळाच्या नेतृत्वाखाली कायम ठेवीवर सातत्याने वाढता व्याजदर मिळालेला असून, लाभांश वाढताच दिला आहे. संचालकांच्या विश्वासावरच बँकेने साडेअकराशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.