शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

शाळेतील उपस्थितीबाबत शिक्षकच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

अहमदनगर : राज्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे आदेश असल्याने गोंधळ उडाला आहे. शिक्षण संचालकांनी ...

अहमदनगर : राज्यातील शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे आदेश असल्याने गोंधळ उडाला आहे. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती सांगितली आहेे, तर स्थानिक अधिकारी शिक्षकांना तोंडी आदेश देत १०० टक्के उपस्थित राहण्यास सांगत आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

१५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, यंदा कोरोनामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वर्ग भरले नाहीत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी शाळेत येऊन ॲानलाइन अभ्यासक्रम द्यायचा आहे. आता शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याबाबत काहीसा संभ्रम आहे. शिक्षण संचालकांनी ५० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून अध्ययन करावे, असे आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे दहावी, बारावीच्या शिक्षकांना मात्र १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.

-----------------

जिल्ह्यातील शाळा

जि.प. शाळा - ३५७३

माध्यमिक शाळा - १८०३

जि. प. शिक्षक - ११,५२८

माध्यमिक शिक्षक - २१,४२६

-----------

संचालकांचे पत्र काय?

पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाचे सर्व शाळा महाविद्यालयांत ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. दहावी व बारावीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य राहील. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

-----------

जि. प. चे पत्र काय?

शिक्षकांची उपस्थिती किती असेल याबाबत जिल्हा परिषदेकडून वेगळे पत्र शिक्षकांसाठी काढण्यात आलेले नाही. काही शिक्षकांना अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देऊन १०० टक्के उपस्थितीबाबत कळवले आहे. मात्र तसा लेखी आदेश काढण्यात आलेला नाही.

-----------

प्राथमिक शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांचे ५० टक्के उपस्थितीचे पत्र आहे. त्याप्रमाणे शिक्षकांना सूचना दिल्या असून, पहिल्या दिवसापासूनच शिक्षकांनी ॲानलाइन अभ्यासक्रम देण्याचे काम सुरू केले आहे. अधिकाऱ्यांमार्फत विविध शाळांना भेटी देऊन पाहणीही करण्यात येत आहे.

- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

-----------

शिक्षकांची कसरत

शिक्षकांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी चोख कामगिरी बजावली आहे. कोविड काळात विविध सर्वेक्षण तसेच कोविड सेंटरवरही शिक्षकांनी कामे केली आहेत. आताही जवळपास सर्वच शिक्षक शाळेत उपस्थित राहतात. ग्रामस्थांंशी, पालकांशी चर्चा करून हिवरे बाजारप्रमाणे शाळा सुरू करता येऊ शकतात. शिक्षक त्यासाठी तयार आहेत.

- सदानंद डोंगरे, शिक्षक, जि. प. शाळा, पिंपळगाव माथा, ता. संगमनेर

-------------

शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षक शाळेत उपस्थित राहून ॲानलाइन अध्ययनाचे काम करत आहेत. गेल्या काही दिवसांत शिक्षकांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे कोविड ड्यूटी, तसेच इतर काम केले. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकडे सर्वच शिक्षक लक्ष देत आहेत.

- राजू बनसोडे, शिक्षक, जि. प. शाळा, वाकडी, जि. राहाता