शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची बदली आता तीन नव्हे पाच वर्षांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

ग्रामविकास विभागाने ७ एप्रिलला शासन निर्णय जाहीर केला असून त्यामध्ये आंतरजिल्हा तसेच जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्याबाबत काही सुधारित धोरण ...

ग्रामविकास विभागाने ७ एप्रिलला शासन निर्णय जाहीर केला असून त्यामध्ये आंतरजिल्हा तसेच जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्याबाबत काही सुधारित धोरण जाहीर केले आहेत. या धोरणाबाबत शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महत्त्वाचा बदल म्हणजे यापूर्वी सर्वसाधारण क्षेत्रात एकाच शाळेवर तीन वर्षे सेवा केल्यानंतर बदली होत होती. आता संबंधित शिक्षकांना एकाच शाळेवर पाच वर्ष सेवा करावी लागणार आहे. त्यानंतर तो शिक्षक बदलीसाठी पात्र होईल. यासंदर्भात काही शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण पाच वर्षे एका शाळेवर राहिले तर संबंधित शिक्षकाला आणि एकूणच शिक्षणाला स्थैर्य येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे जे शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत ते आणखी दोन वर्षे अडकून पडणार आहेत.

दुसरी बाब म्हणजे आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना पूर्वी एकच जिल्ह्यात बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता त्यासाठी त्यांना चार जिल्ह्यांचा पर्याय असेल. याशिवाय पाच वर्षानंतर संबंधित शिक्षक पुन्हा आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करू शकतात. पूर्वी ही तरतूद नव्हती. जिल्हांतर्गत बदलीमध्ये पूर्वी शिक्षकांना बदलीसाठी २० शाळा निवडता येत होत्या, आता ३० शाळा निवडता येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांसमोर आणखी पर्याय खुले झाले आहेत.

-----------

त्या शिक्षकांना दरवर्षी

अर्ज करता येणार नाही

यापूर्वी संवर्ग १ मधील दिव्यांग किंवा व्याधिग्रस्त शिक्षकांना, तसेच संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत शिक्षकांना दरवर्षी बदलीसाठी अर्ज करता येत होता. या नवीन धोरणात मात्र आता त्यांना तीन वर्षांनी बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या शिक्षकांची ही संधी काही प्रमाणात कमी करण्यात आली आहे.

---------

अवघड क्षेत्रातून मात्र

तीन वर्षात बदली

नवीन धोरणानुसार अवघड क्षेत्रात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केलेले शिक्षक बदलीला पात्र ठरणार आहेत. तसेच सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एकाच शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत.

----------

जिल्हा परिषदेकडून माहितीचे संकलन सुरू

नवीन धोरणानुसार संवर्गनिहाय किती शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून घेण्याचे काम सुरू झाले आहे. संवर्गनिहाय ही माहिती आल्यानंतर ३१ मे पर्यंत शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात.

------------------

ज्या शिक्षकांनी पेसा क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांना त्यांच्या तालुक्यात बदली मिळायला हवी होती. परंतु नवीन धोरणानुसार शासन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष सेवा केल्यानंतर बदलीस पात्र ठरवत आहे. म्हणजे पेशातील शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात जाण्यास अजून अवधी लागेल, ही त्यांची गैरसोय आहे.

- सुदाम भागवत, माजी संचालक, शिक्षक बँक

----------

आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी नवीन नियमावलीत चांगले बदल आहेत. आंतरजिल्हा बदली नंतर पुन्हा पाच वर्षांनी संबंधित शिक्षकाला बदली मागता येणार आहे. हा निर्णय समाधानकारक आहे. शिवाय तीन वर्षांनी होणारी बदली आता पाच वर्षांनी होते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षणामध्ये स्थैर्य येईल.

- संदीप मोटे, जिल्हा सरचिटणीस, शिक्षक संघ