शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी जाणार संपावर

By admin | Updated: April 23, 2016 00:30 IST

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर दिल्लीतून डिजिटल इंडियाचा नारा देण्यापूर्वीच महाराष्ट्रात सुरू झालेल्या आॅनलाईन सातबाराची गाडी ५ वर्षातही सुरळीत धावली नाही.

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरदिल्लीतून डिजिटल इंडियाचा नारा देण्यापूर्वीच महाराष्ट्रात सुरू झालेल्या आॅनलाईन सातबाराची गाडी ५ वर्षातही सुरळीत धावली नाही. महसूल खात्याचा कारभार आॅनलाईन संगणकीकृत झाला असला तरी शेकडो संगणकांवर दररोज काम करणाऱ्या महसूल खात्यात एकही पूर्णवेळ संगणक अभियंता तथा समन्वयक नसल्याने या पदांची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, संगणकीकृत सातबाराला सर्व्हरची साडेसाती लागल्याने गेल्या आॅक्टोबरपासून संगणकीकृत सातबाराचे काम जवळपास ढेपाळले आहे. संगणकीकृत सातबाराबाबत येणाऱ्या अडचणींकडे वारंवार लक्ष वेधूनही सरकारकडून त्याची दखल घेऊन उपाययोजना न झाल्याने अखेर गुरूवारी श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाठ्यांनी आपल्याकडील डी.एस.ई. (डिजिटल सिग्नेचर्स) तहसील कार्यालयात जमा करून सरकारच्या निषेधाचे पुढचे पाऊल टाकले. संगणकीकृत सातबाऱ्यासाठी सुरुवातीस एम.ई.एस. प्रणाली वापरण्यात आली. १५ आॅक्टोबर २०१५ पासून एनआरएलएमपी संगणक प्रणालीचा वापर सुरू आहे. या प्रणालीद्वारे आॅनलाईन नोंदीबाबत तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना प्रशिक्षणच मिळाले नाही. प्रशिक्षणाची तत्काळ सोय होऊन या प्रणालीच्या वापराबाबत मार्गदर्शक पुस्तिका मिळावी, सर्व्हर नेहमी दिवसा बंद राहते व रात्री काही कालावधीसाठी सुरू होऊन नंतर पुन्हा बंद होते. त्यामुळे तलाठ्यांना रात्रंदिवस काम करूनही खातेदारांना त्यांचा अचूक सातबारा देत येत नाही. मोठ्या गट क्रमांकातील एका खातेदाराचा सातबारा दुरूस्तीची नोंद पूर्ण होईपर्यंत त्याच गट क्रमांकातील अन्य खातेदारांच्या नोंदी संगणक स्वीकारत नाही. फेरफाराच्या नोंदी घेताना अनेक तास वाया जातात. अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील तलाठ्यांनी २१ मार्चलाच या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर तहसीलदारांनी नायब तहसीलदार पाठवून महसूल मंडळांमध्ये जाऊन वस्तुस्थितीचे अवलोकन करून तलाठ्यांना येणाऱ्या अडचणींचे अहवालसुद्धा सादर केले. पण महिनाभरात त्यापुढे कोणतीही सुधारणा न झाल्याने गुरूवारी तलाठ्यांनी डिजिटल सिग्नेचर तहसीलमध्ये जमा करून सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याची तयारी केली आहे.संगणकीकृत सातबाराच्या अडचणीनोंदी भरताना वारंवार लॉगआऊट होते. लॉगइन होण्यास वेळ लागतो. नोंद भरताना एरर येऊन पुन्हा लॉगआऊट होते. काही नोंदी भरल्यानंतर पूर्वालोकन योग्य दिसते. नोंद साठविल्यानंतर काही नोंदीचा फेरफार दिसत नाही. नोंद भरताना प्रत्येक टप्प्यावर युजर रिक्वेस्ट एरर येतो. त्यामुळे ही नोंद पूर्ण झाली किंवा नाही, हे समजत नाही. एखादी नोंद डबल दिसते. बोजा, विहीर, बोअर या सर्व नोंदी सामान्य फेरफारमधून भराव्या लागतात. त्या नोंदी भरताना २ ते ३ तास लागतात. असे दिवसभर किंवा रात्रभर बसल्यास फक्त २ किंवा ३ नोंदी होतात. कधी कधी सर्व्हरमुळे त्यासुद्धा भरल्या जात नाहीत. एका गटात एखादी नोंद घेतल्यास त्याच गटातील दुसऱ्या नोंदीसाठी तो गट ब्लॉक होत असल्याने बऱ्याच नोंदी पेंडिग आहेत. नोंदीच्या संख्या वाढून लोकांच्या रोषास सामोरे जावे लागते. वर्ग-२ च्या कोणत्याही नोंदी भरल्या जात नाहीत. आॅनलाईनला ७/१२ पोट हिस्से पडत नसल्याने खंडकरी शेतकऱ्यांचे वाटप झालेल्या क्षेत्राचे नवीन ७/१२ तयार होत नाहीत. मंडळाधिकाऱ्यांना नोंदी मंजूर करताना वारंवार एरर येतो. तलाठ्यांना संगणक प्रशिक्षण नसल्याने सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे कामकाज थांबते. वेळ वाया जातो त्यामुळे जनसामान्यांमध्ये महसूल विभागाची प्रतिमा खालावते. संगणकीकृत ७/१२ आॅनलाईन कामकाज जोपर्यंत सुरळीत व बिनचूक होत नाही. तोपर्यंत तालुका स्तरावर सॉफ्टवेअरची माहिती असणाऱ्या संगणक तज्ज्ञांची नेमणूक करावी.- के. बी. खाडे, तलाठी, श्रीरामपूर