शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अधिकार्‍यांना कोंडून राज्यमार्गरोखला

By admin | Updated: March 2, 2015 13:25 IST

नेवासा तालुक्यातील खरवंडी व परिसरात अजुनही मुळा पाटपाण्याचे रोटेशन न पोहोचल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी अधिकार्‍यांना कोंडून नगर-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

नेवासा : नेवासा तालुक्यातील खरवंडी व परिसरात अजुनही मुळा पाटपाण्याचे रोटेशन न पोहोचल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारी अधिकार्‍यांना कोंडून नगर-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी जि.प. सदस्य अजित फाटके, प्रकाश उंदरे, संभाजी मुरकुटे, मुकुंद भोगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.मुळा पाटबंधारेच्या वडाळा बहिरोबा शाखेअंतर्गत असलेल्या चारी ५ व ६ वरील शेतकरी आवर्तन सुरु झाल्यापासून पाण्यासाठी आग्रही होते. मागील आवर्तन काळात या चारीवरील शेतकर्‍यांना अजिबात पाणी न मिळाल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके करपत आहेत. अधिकार्‍यांकडून आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने वडाळा बहिरोबा, निपाणी निमगांव, खरवंडी येथील संतप्त शेतकर्‍यांनी वडाळा बहिरोबा शाखा कार्यालयात नेवासा उपविभागाचे उपअभियंता नवलाखे, शाखाधिकारी के.सी.दुशिंग, एस. के. शेळके, आर.बी.पळघडमल यांच्या कार्यालयास कुलूप ठोकून शनिवारी सकाळपासूनच त्यांना कोंडले.मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता ए.एस.वडार यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देऊनही उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येताच शेतकर्‍यांनी शाखा कार्यालयासमोर नगर-औरंगाबाद महामार्गावर ठाण मांडले. संभाजीराव फाटके यांनी अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याचे सांगून कालवा सल्लागार समितीच्या चुकीच्या नियोजनामुळे ही वेळ आल्याचा आरोप केला. मुळा धरणाच्या निर्मितीच्यावेळी बारमाही पाणी पुरवठय़ाचे नियोजन होते. ते गेल्या काही वर्षात दोन आवतर्नावर आलेच कसे? असा सवालही त्यांनी केला. अधिकारी राजकारण्यांच्या हातचे कळसूत्नी बाहुली असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप अजित फाटके यांनी केला. मुकुंद भोगे यांचेही भाषण झाले. आंदोलनात प्रकाश उंदरे, संभाजी मुरकुटे,आबासाहेब फाटके, बाबासाहेब फाटके, खरवंडीचे सरपंच सिद्धार्थ भोगे, पोलीस पाटील संदीप फाटके तसेच तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

■ मुळा पाटपाण्याच्या रोटेशनप्रश्नी नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरु करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रसंगी आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. मुळा पाटबंधारेचे उपअभियंता नवलाखे यांनी सोमवारपासून चारी ५ व ६ ला पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.