शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाटचारी आवर्तनासाठी रास्ता रोको

By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST

नगर-पैठण राज्य मार्गावरील पाडळी पुलावर मंगळवारी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

तिसगाव : मुळा पाटचारी लाभक्षेत्रातील पाडळी, चितळी, सुसरे, साकेगाव भागाला आवर्तन सोडून पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी नगर-पैठण राज्य मार्गावरील पाडळी पुलावर मंगळवारी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संदीप राजळे, बाजीराव गर्जे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पाटपाणी आवर्तनाने परिसराचे जलस्त्रोत बळकट होतात, विहिरींना नैसर्गिकरित्या याचा फायदा होतो. वाढती चारा व पाणी टंचाई यावर आवर्तन हा दुहेरी पर्याय आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगत मागणी लावून धरली. तहसीलदार सुभाष भाटे, पाटबंधारे अधिकारी वृध्देश्वर कारखान्यावर गेल्यानंतर तेथे समन्वय बैठकीनंतर ते पाडळीला आले. पाणी आवर्तनाची निश्चित तारीख, वेळ पाटबंधारे अधिकारी देत नसल्याने रास्ता रोको लांबला. येत्या २५ आॅगस्टपर्यंत आवर्तन सुटेल, असे आश्वासन उपअभियंता एस.टी. देशमुख, शिवाजी भगत यांनी दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. आश्वासनाप्रमाणे आवर्तन न आल्यास पुन्हा याच ठिकाणी रस्त्यावर येऊ, असा इशारा पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे यांनी दिला.वीजप्रश्नी दोन तास रास्ता रोकोबोधेगाव : वीज पुरवठा जोडलेला नसतांनाही आकारलेले बिल कमी करून जळालेले जनित्र तातडीने दुरुस्त करावे, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील लखमापुरी ग्रामस्थांनी मंगळवारी शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरील कांबी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन दोन तास चालले. लखमापुरी येथील गावठाणमधील जनित्र अनेक वर्षापासून बंद असूनही ‘महावितरण’ कडून वीज बिलाची आकारणी केली जाते, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. जनित्र बंद असल्याने बिल कमी करावे, जळालेले जनित्र तातडीने सुरु करून सुरळीत वीज पुरवठा करावा, या मागण्यांसाठी कांबी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले. ‘महावितरण’ चे उप अभियंता सतीश शिंपी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असता त्यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन हा प्रश्न तातडीने मार्र्गी लावण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनात अशोक कवडे, बंडू कुराळे, पांडुरंग गवते, दत्तात्रय तिळे, एकनाथ गावंडे, भाऊराव निर्मळ, भास्कर गावंडे, आशाबाई पवार तसेच शेतकरी सहभागी झाले होते. वीज, पाटपाणीप्रश्नी रास्ता रोकोतिसगाव : मुळा उजवा कालव्याला आवर्तन सोडावे, शेतात लोंबकळलेल्या तारा व वाकलेल्या वीज खांबाची दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी श्री क्षेत्र हनुमान टाकळी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी नगर-पैठण राज्यमार्गावर वृध्देश्वर साखर कारखाना येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरपंच कुशीनाथ बर्डे, अ‍ॅड. रावसाहेब बर्डे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ढोल, ताशांच्या गजरात मागण्या मांडत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. श्री क्षेत्र हनुमान टाकळी गाव एकेकाळी पाथर्डी तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा करीत होते. तेथे सध्या पाऊस लांबल्याने पाणी टंचाई आहे. पाटपाणी आल्यास जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, टँकरची गरज पडणार नाही, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. लोंबकळलेल्या वीज तारा व वाकलेल्या खांबांनी वीज अपघात होतात. तारा व खांबाच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षापासून ग्रामसभा होऊन ठरावही झाला. हा ठराव ‘महावितरण’ ला देण्यात आला. तरीही दुरुस्ती होत नाही, उलट दुरुस्तीसाठी पैशाची मागणी होते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी ‘महावितरण’ च्या अधिकाऱ्यांवर केला. पाणी आवर्तनाबाबत तीन दिवसात कार्यवाही करू, असे आश्वासन उपअभियंता एस.टी.देशमुख यांनी दिले तर ‘महावितरण’ च्यावतीने तारा व खांबांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव करण्याचे मान्य केले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. पाथर्डीचे तहसीलदार सुभाष भाटे यांनी समन्वयाची चर्चा घडवली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.