शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

हिवरेबाजार ग्रामस्थांचे राज्य सरकारला साकडे, पर्यटकांची सोय करण्यासाठी सुविधा हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:28 IST

अहमदनगर : दिवसेंदिवस वाढत चाललेली पर्यटक संख्या लक्षात घेता गावाची माहिती देण्यासाठी कमीत कमी ५ व्यक्तींची आवश्यकता आहे. अनेकदा एकाच वेळी जास्त सहली आल्यास प्रत्येकाला माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती देणे शक्य होत नाही. त्यातूनच वाद निर्माण होतात. येणाºया सहलींना गाव पातळीवर माहिती देणे व सुविधा पुरविणे ग्रामस्थांना आता शक्य होत नाही. शासनस्तरावरून किंवा विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून येणाºया लोकांसाठी मूलभूत सुविधा, मार्गदर्शकाच्या मानधनाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी आदर्शगाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील ग्रामसभेत करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : दिवसेंदिवस वाढत चाललेली पर्यटक संख्या लक्षात घेता गावाची माहिती देण्यासाठी कमीत कमी ५ व्यक्तींची आवश्यकता आहे. अनेकदा एकाच वेळी जास्त सहली आल्यास प्रत्येकाला माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती देणे शक्य होत नाही. त्यातूनच वाद निर्माण होतात. येणाºया सहलींना गाव पातळीवर माहिती देणे व सुविधा पुरविणे ग्रामस्थांना आता शक्य होत नाही. शासनस्तरावरून किंवा विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून येणाºया लोकांसाठी मूलभूत सुविधा, मार्गदर्शकाच्या मानधनाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी आदर्शगाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील ग्रामसभेत करण्यात आली.मंगळवारी येथील ग्रामसभा पार पडली. अध्यक्षस्थानी सरपंच पोपटराव पवार होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, सुखदेव सोळंकी आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.ग्रामपंचायतीचे उत्पन्न अवघे ३.५० लाख रूपये आहे. त्यातून मूलभूत देखभाल दुरुस्तीही होत नाही. येथे येणाºया पर्यटकांना वेगळ्या सुविधांची अपेक्षा असते. गावाविषयी माहिती देण्यासाठी येणाºया सहलीकडून अल्प प्रमाणात फी आकारली जाते. त्यातून दोन मुलांना मानधन दिले जाते. दिवसेंदिवस वाढत चाललेली पर्यटक संख्या लक्षात घेता माहिती देण्यासाठी कमीत कमी ५ व्यक्तींची आवश्यकता आहे. बºयाच वेळा एकाच वेळेस जास्त सहली आल्यास माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती देणे शक्य होत नाही. शासन स्तरावरून किंवा विविध कंपन्याच्या सामाजिक दायित्वातून येणाºया लोकांसाठी मूलभूत सुविधा व मार्गदर्शकाच्या मानधनाची व्यवस्था शासनाने करावी. येणाºया सहलींना गाव पातळीवर माहिती देणे व सुविधा पुरविणे ग्रामस्थांना आता शक्य होत नाही, असा ठराव ग्रामसभेत केला. पाणी ताळेबंद व आगामी पीक पद्धतीबाबत चर्चा झाली.