केडगाव : नगर तालुक्यात नुकत्याच ५६ गावांच्या निवडणुका झाल्या. यात मोठा राजकीय संघर्ष उफाळून आल्याने गावागावांत कटुतेची भावना निर्माण झाली. काही जागांवर जवळचेच नातलग एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, चुरशीची लढत होऊनही टाकळी काझी गावातील दोन्ही आघाड्यांनी एकत्र येत चहापान तर केलेच
ग्रामपंचायत निवडणुका म्हटले की, गावात वाद-विवाद आलेच. हा या गटाचा तो त्या गटाचा. यातून राजकीय वाद-विवाद होऊन गावातील शांतता व एकोपा नाहीसा होतो. यामुळे गावातील वातावरण बिघडते
निवडणूक संपली आता राजकीय संघर्षही संपला असा एकीचा नारा त्यांनी दिला. या गावात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पारंपरिक लढत झाली. सेनेला भाजपने मदत केल्याचे दुर्मीळ उदाहरण येथे घडले. निवडणुकीचा निकाल काहीही लागो
यावेळी स्वाभिमानी विकास पॅनलचे शंकरराव ढगे, काशीनाथ गावडे, आसाराम मोटे, बाळासाहेब येवले, संभाजी पवार तर शेतकरी विकास पॅनलचे संपतराव म्हस्के, वसंतराव म्हस्के, बाबासाहेब मोटे यांच्यासह पॅनलचे प्रमुख उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.