शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

निवडणूक संपताच टाकळी काझीतील कटुताही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST

केडगाव : नगर तालुक्यात नुकत्याच ५६ गावांच्या निवडणुका झाल्या. यात मोठा राजकीय संघर्ष उफाळून आल्याने गावागावांत कटुतेची भावना निर्माण ...

केडगाव : नगर तालुक्यात नुकत्याच ५६ गावांच्या निवडणुका झाल्या. यात मोठा राजकीय संघर्ष उफाळून आल्याने गावागावांत कटुतेची भावना निर्माण झाली. काही जागांवर जवळचेच नातलग एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, चुरशीची लढत होऊनही टाकळी काझी गावातील दोन्ही आघाड्यांनी एकत्र येत चहापान तर केलेच; पण एकत्रित गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन झाले गेले विसरून जायचे असा सूर आळवला.

ग्रामपंचायत निवडणुका म्हटले की, गावात वाद-विवाद आलेच. हा या गटाचा तो त्या गटाचा. यातून राजकीय वाद-विवाद होऊन गावातील शांतता व एकोपा नाहीसा होतो. यामुळे गावातील वातावरण बिघडते; परंतु निवडणुकीत मतदान करून उत्सव साजरा करणारे गाव आपण पाहिले नसेल. टाकळी काझी या गावात मतदान झाल्यानंतर सर्व विरोधक एकत्र येतात. चहापाणी एकत्र घेतात व गावचे ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरात आरती करून निवडणुकीत झाले गेले ते सगळे विसरून लोकशाहीचा हा उत्सव आनंदात साजरा करतात. साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर हे सर्व विरोधक एकत्र आले. त्यांनी एकत्र येत चहा घेतला. निवडणुकीतील चर्चा रंगल्या. नंतर गावचे ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीची आरती केली. त्यानंतर सिद्धार्थ बुद्ध विहार या ठिकाणी जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांची वंदना म्हणण्यात आली.

निवडणूक संपली आता राजकीय संघर्षही संपला असा एकीचा नारा त्यांनी दिला. या गावात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पारंपरिक लढत झाली. सेनेला भाजपने मदत केल्याचे दुर्मीळ उदाहरण येथे घडले. निवडणुकीचा निकाल काहीही लागो; पण गावातील एकोपा टिकला पाहिजे, अशीच भावना यावेळी दोन्ही आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली.

यावेळी स्वाभिमानी विकास पॅनलचे शंकरराव ढगे, काशीनाथ गावडे, आसाराम मोटे, बाळासाहेब येवले, संभाजी पवार तर शेतकरी विकास पॅनलचे संपतराव म्हस्के, वसंतराव म्हस्के, बाबासाहेब मोटे यांच्यासह पॅनलचे प्रमुख उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.