शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

...तर नागवडेंना राजकीय संन्यास घ्यायला लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने पाच दशके सहकारी साखर कारखानदारीत विश्वासार्हता जोपासण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे आणि बँकांचे ...

श्रीगोंदा : नागवडे घराण्याने पाच दशके सहकारी साखर कारखानदारीत विश्वासार्हता जोपासण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे आणि बँकांचे हप्ते वेळेवर फेडण्याचे काम केले आहे. विरोधकांनी नागवडेंच्या दोन टेक्स्टाइल मिल, खासगी दोन साखर दाखविले, तर आपण नागवडेंना राजकीय संन्यास घ्यायला लावू. मात्र, केवळ विरोधास विरोध करण्यासाठी विरोधकांनी खोटे आरोप करू नयेत. यापुढे खोटारड्यांना जशास तसे उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर नागवडे साखर कारखान्याचे संचालक विलासराव काकडे यांनी विरोधकांना दिले.

केशव मगर, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर चौफेर टीका केली होती. त्यांच्या टीकेला काकडे यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.

काकडे म्हणाले, केशव मगर यांना कारखान्याचे उपाध्यक्ष करण्यासाठी आम्ही शिफारस केली. आता त्यांनी स्वत:ला काही मिळाले नसल्याने विरोधी भूमिका घेतली आहे.

सभासदांच्या पैशातून शिवाजीराव नागवडे यांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते सहकारी मित्र पाच वर्षांत पाच वेळाही कारखान्यावर आले नाहीत. त्यांनी आता स्मारकासाठी ४२ लाखांचा मुरूम टाकल्याचा खोटा आरोप केला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यंदा साखर कारखान्याकडे १० लाख मे. टन उसाची नोंद असताना केवळ पाच लाख मे. टन उसाचे गाळप करता आले. इतर ऊस शेजारील साखर कारखान्यांनी नेला आहे. श्रीगोंदा, शिरूर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पाच हजार मे. टन विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संचालक मंडळाची मान्यता घेतली आहे, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली आहे, असे काकडे यांनी सांगितले.

--

घनश्याम शेलारांनी शेजाऱ्यांना सल्ला द्यावा...

नागवडे कारखाना विस्तारीकरणास विरोध करणाऱ्या घनश्याम शेलार यांच्या शेजारचे साखर कारखाने विस्तारीकरण करत आहेत. शेलारांनी शेजाऱ्यांना सल्ला द्यावा.

शिवाजीराव नागवडे यांच्या विश्वासास पात्र अशी कामगिरी राजेंद्र नागवडे यांनी केली आहे. सभासदांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली नागवडे साखर कारखान्याची निवडणूक किसान क्रांती मंडळ लढविणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले.