शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शहराला रोज पावणेसहा कोटी लीटर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST

अहमदनगर : मुळा धरणातून शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकतो इतके ५७ एमएलडी म्हणजे ५ कोटी ७० लाख लीटर पाणी ...

अहमदनगर : मुळा धरणातून शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकतो इतके ५७ एमएलडी म्हणजे ५ कोटी ७० लाख लीटर पाणी दररोज उपलब्ध होत असल्याचे वास्तव सोमवारी केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्यास पाणी योजना नव्हे तर महापालिकेचा पाणीपुरवठा विभागच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेव्दारे मिळणाऱ्या पाण्याचे खासगी यंत्रणेमार्फत मोजमाप केले असता, वरील माहिती समोर आली आहे. यावेळी महापालिका स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्यासह नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक निखील वारे, आयुक्त शंकर गोरे, जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. सभापती घुले यांच्यासह पथकाने ज्या मुळा धरणातून पाणीउपसा होतो, तिथे भेट देऊन यंत्राव्दारे पाणी तपासणी केली. मुळा धरणातून जुन्या व नवीन अशा दोन पाणी योजनांव्दारे ९९ एमएलडी पाणी उपसा होतो. यापैकी विळदघाट येथील उपकेंद्रात ९५ एमएलडी पाणी पोहोचते. तेथे पाण्यावर प्रक्रिया होऊन १०० एमएलडी जलवाहिनीव्दारे बाहेर पडते. यापैकी २९ एमएलडी पाणी नागापूर उपकेंद्रात तर उर्वरित ७१ एमएलडी पाणी वसंत टेकडीसाठी येते. वसंत टेकडी येथे येणारे पाणी मोजले असता, ५७ एमएलडी एवढे पाणी वसंत टेकडी येथे पाहोचते. तेथून शहराला वितरित होते. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीला प्रतिदिन १३५ लीटर पाणी द्यायचे झाल्यास ६७ एमएलडी पाणी अवश्रुत आहे. त्यापैकी ५७ एमएलडी पाणी वसंत टेकडी येथे उपलब्ध होते. याचा अर्थ दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी हे पाणी पुरेसे आहे. परंतु, महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, वसंत टेकडी येथून हे पाणी जाते कुठे, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

.....

पाणी योजनेतून गावांना २४ तास पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरून विळद, देहरे, आणि शिंगवे गावाला २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. ही गावे पाणीपट्टी मात्र भरत नाहीत. चोवीस तास पाणी देऊन ग्रामपंचायती पाणीपट्टी भरत नसल्याचेही यावेळी समोर आले.

...

शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन पाणी योजना असूनही पाणी कुठे मुरते, याचा शोध घेण्यासाठी मुळा धरण, विळदघाट आणि वसंत टेकडी अशा तिन्ही ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या आकड्यांवर नजर टाकल्यास मुळा धरणातून वसंत टेकडी येथे पुरेसे पाणी पोहोचते. शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकू इतके पाणी उपलब्ध होते. परंतु, नगरकरांना दिवसाआडच पाणीपुरवठा होत असून, या पाण्याचा शोध घेऊन नगरकरांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाईल.

- अविनाश घुले, सभापती

..

पाणीपुरवठा विभाग तोंडघशी

मुळा धरणातून पुरेसे पाणी येत नाही, त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुवठा करावा लागत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून आजवर सांगितले गेले. परंतु, मुळा धरणातून पाणी योजनेव्दारे शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल एवढे पाणी उपलब्ध होत असल्याचे समोर आल्याने मनपाचा पाणीपुरवठा विभाग चांगलाच तोंडघशी पडला आहे.

...

असे आहे पाणी

मुळा धरणातून होणारा उपसा - ९९ एमएलडी

विळदघाट येथे उपलब्ध होणारे पाणी - ९५ एमएलडी

विळद घाटातून बाहेर पडणारे पिण्यायोग्य पाणी -

नागापूर जलवाहिनी - २९ एमएलडी, वसंत टेकडीसाठी ७१ एमएलडी

वसंत टेकडी येथे उपलब्ध होणारे पाणी - ५७ एमएलडी