शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

श्रीगोंदेकरांना आता मुबलक पाणी

By admin | Updated: April 22, 2016 00:13 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे घोड धरणावरून आणलेल्या पाणी योजनेतून रोज २५ टँकरच्या मदतीने आठ ते दहा लाख लीटर पाणी शहर व परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरविले जाते. तसेच नवीन फिल्टर हाऊस ते जुन्या फिल्टर हाऊसपर्यंतच्या पाईपलाईनचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्ष छाया गोरे यांनी दिली.गोरे म्हणाल्या, शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव पालिका प्रशासनाला आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन वेळू तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची विनंती केल. त्यामुळे वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच घोड धरणावरून नवीन योजनेतून पाणी आणले आहे. हे पाणी सध्या नवीन फिल्टर हाऊसमध्ये आणले आहे. याठिकाणी शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी रोज २५ टँकर भरले जातात. यातून वाड्या-वस्त्यांना पाणी दिले जाते. सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन फिल्टर हाऊस ते जुने फिल्टर हाऊस या दरम्यान पाईप लाईनचे काम चालू असून येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पालिका पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी प्रयत्नशील आहेत. टंचाईस्थितीमुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही गोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)