शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

श्रीगोंदेकरांना आता मुबलक पाणी

By admin | Updated: April 22, 2016 00:13 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे घोड धरणावरून आणलेल्या पाणी योजनेतून रोज २५ टँकरच्या मदतीने आठ ते दहा लाख लीटर पाणी शहर व परिसरातील वाड्या-वस्त्यांना पुरविले जाते. तसेच नवीन फिल्टर हाऊस ते जुन्या फिल्टर हाऊसपर्यंतच्या पाईपलाईनचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगराध्यक्ष छाया गोरे यांनी दिली.गोरे म्हणाल्या, शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव पालिका प्रशासनाला आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन वेळू तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची विनंती केल. त्यामुळे वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच घोड धरणावरून नवीन योजनेतून पाणी आणले आहे. हे पाणी सध्या नवीन फिल्टर हाऊसमध्ये आणले आहे. याठिकाणी शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी रोज २५ टँकर भरले जातात. यातून वाड्या-वस्त्यांना पाणी दिले जाते. सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन फिल्टर हाऊस ते जुने फिल्टर हाऊस या दरम्यान पाईप लाईनचे काम चालू असून येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होऊन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. शहरातील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पालिका पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी प्रयत्नशील आहेत. टंचाईस्थितीमुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही गोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)