शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

सात महिन्यात जिल्ह्यात २७ जण जाळ््यात

By admin | Updated: July 29, 2014 01:03 IST

अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात जानेवारी २०१४ पासून म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी लाचेच्या जाळ््यात अडकले आहे.

अहमदनगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ््यात जानेवारी २०१४ पासून म्हणजे अवघ्या सात महिन्यांमध्ये जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी लाचेच्या जाळ््यात अडकले आहे. एक-दोन दिवस पोलीस कोठडीची हवा खाऊन ते सही-सलामत बाहेर आले आहेत. त्यांचा तपास प्रलंबित असल्याने त्यांच्यावर अद्याप दोषारोपपत्रही दाखल झालेले नाही. २७ पैकी फक्त दोनच अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र दाखल झाले आहे. दरम्यान लाचखोरांपैकी फक्त एकाच अधिकाऱ्याची मालमत्ता हस्तगत केली आहे. त्याच्याकडे नऊ कोटीची माया सापडली होती. अन्य अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी मात्र वाऱ्यावरच गेली आहे. एक हजार रुपयांपासून ते चार लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तलाठी, मंडलाधिकारी, अभियंता, महसूल विभागातील अधिकारी, पोलीस यांचा समावेश आहे. पारनेर येथील एका न्यायाधीशाचाही लाचेच्या यादीत नंबर लागल्याने न्यायव्यवस्थेबाबतही सामान्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)यांचा तपास प्रलंबित (२०१४)जया पनाड (तलाठी,अकोले), सुनील फापाळे (महसूल, शिर्डी), संजय रासने (मंडलाधिकारी, राहाता), अनिल गरुड (महसूल, कोपरगाव), प्रवीण कुलकर्णी (न्यायालय, पारनेर), विभावरी गायकवाड (विकास महामंडळ, नगर), अंकुश बोडखे (पोलीस, नेवासा), विश्वनाथ दहे (मनपा, नगर), विश्वास यादव (अभियंता, शेवगाव), रोहिदास शेलार (पोलीस, घारगाव), बाळकृष्ण वराट (जि.प.नगर), संभाजी गर्जे (पोलीस, शेवगाव), साहेबराव बेळगे (जि.प.नगर),सोन्याबापू मांडगे, चांगदेव आंधळे (पोलीस, नगर), अविनाश दाभाडे (मंडलाधिकारी, रुईछत्तीसी), चंद्रकांत नागवडे (नायब तहसीलदार, नगर), अण्णासाहेब सोनवणे (पोलीस, पाथर्डी), उमेश कावळे (अन्न-औषध,नगर), अर्जुन पठाडे (जि.प. पाटबंधारे, शेवगाव), प्रभू हाडबे (प्रदूषण नियंत्रण,नगर), दिलीप निऱ्हाळी (दुय्यम निबंधक), लक्ष्मीकांत पाटील, पांडुरंग बांगर (राजूर), शीतलकुमार साबळे (संगमनेर), सुभाष भारती (संगमनेर), अप्पासाहेब ढेरे (मंडलाधिकारी, घोडेगाव).एक प्रकरण वगळता हस्तगत मालमत्ता शून्यलाच स्वीकारताना रक्कम मिळून आल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या घरावर धाडी टाकल्या जातात. त्यांच्याकडील मालमत्ता सील केली जाते. तसेच चौकशी केली जाते. मात्र एखादी-दुसरी सोडली तर सर्वच घटनांमध्ये कोणतीही अन्य मालमत्ता तपासली गेली नसल्याचे अहवालांवरूनच स्पष्ट झाले आहे. मनपाचे नगररचनाकार विश्वनाथ दहे यांच्या मालमत्तेची चौकशी झाली होती. त्यामध्ये ९ कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली होती. तशी चौकशी अन्य कोणत्याही लाचखोर अधिकाऱ्यांची झाली नसल्याने लाच स्वीकारण्यामध्ये आता अधिकाऱ्यांना भीती वाटत नाही.