शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात हजार घरकुल लाभार्थ्यांना नाहीत जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:59 IST

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत गेल्या पाच वर्षांत सुमारे ...

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत गेल्या पाच वर्षांत सुमारे ३९ हजार घरकुलांची कामे पूर्ण झाली. परंतु साडेसात हजार लाभार्थ्यांना जागा नसल्याने घरकुल मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून संबंधित प्रशासनाशी संपर्क करून या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घरकुलांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, तसेच पारधी आवास योजना राबविण्यात येते. जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ही कामे केली जातात. सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांत नगर जिल्ह्याला ८६ हजार ५६४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी ८० हजार १०१ घरांची नोंदणी झाली पैकी ६९ हजार ५५६ घरकुले मंजूर झाली. त्यातील ३८ हजार ९४५ घरकुलांचे कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत म्हणजे ४५ टक्के उद्दिष्ट यंत्रणेने गाठले आहे.

या प्रक्रियेदरम्यान ९ हजार ३८७ लाभार्थी अपात्र ठरल्याने त्यांना वगळ्यात आले आहे. शासकीय नोकरी असणे, मृत, परागंदा यासह अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली.

दरम्यान, घरकुले मंजूर झाली असली तरी अनेक लाभार्थ्यांना गावात स्वत:च्या मालकीच्या जागा नाहीत. गेल्या वर्षभरापूर्वी ९ हजार ४४८ जागा नसलेले लाभार्थ्यां होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार घेऊन आतापर्यंत १ हजार ९२४ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी गावठाणाची जागा, बक्षीसपत्र, ९९ वर्षाचा करार, तसेच इतर खरेदी खत झाल्याने घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली. मात्र, अजूनही ७ हजार ४४८ घरकुल लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही. सध्या हे लाभार्थी शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत. त्यामुळे गावात असलेली शासकीय जागाच त्यांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून शेती महामंडळाकडे ७१५, गायरान जमिनीसाठी ७३१, वन विभागाकडे २९९, पाटबंधारे विभागाकडे ४४८, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ११६, साखर कारखान्यांकडे ३०२, खासगी शेतकऱ्यांकडे भाडोत्री १ हजार ९९५, तसेच महाराष्ट्र शासनाच्या ८१३ जागांची मागणी करण्यात आलेली आहे. लवकरच ही जागा उपलब्ध होऊन वंचितांना घरे मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

घरकुलांची कामे वेगात व्हावीत यासाठी शासनाकडून राज्यात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान महाआवास अभियान राबविण्यात सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ७० घरकुलांची कामे अभियानात झाली आहेत.

------------

नगर जिल्ह्यातील घरकुल योजनांचा अहवाल

गेेल्या पाच वर्षांतील उद्दिष्ट - ८६५६४

घरकुलांची नोंदणी - ८०१०१

मंजूर- ६९५५६

अपात्र - ९३४६

जागा नसलेले लाभार्थी - ७४४८

आतापर्यंत पूर्ण कामे - ३९९४५

प्रगतीतील कामे - ३०६११

पूर्णत्वाची टक्केवारी - ४४.९९

--------