शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

शेतकरी बचत गटातर्फे बियाण्याचे सर्वेक्षण

By admin | Updated: December 11, 2023 11:57 IST

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांकडून जास्तीत जास्त हे बियाणे उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बचत गटाकडून सोयाबीन बियाण्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या बचत गटांनी आतापर्यंत ५ हजार १९१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी आणि पशू संवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी दिली. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या सभेत खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रगृहीत धरण्यात आलेले आहे. यासाठी ६२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यात कपाशीचे ४ लाख ८० हजार पाकिटे यांची मागणी नोंदविण्यात आलेली असून त्यापैकी ३ लाख २७ हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. हंगामासाठी २ लाख ५५ हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली असून त्यापैकी २ लाख ५ हजार मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले असून ३५ हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा झालेला आहे. सभेत या वर्षीसाठी ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी, प्लस्टिक क्रेटस्, पॉवर स्पे्र पंप, सोलर कंदील, ताडपत्री या व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. सभेला सदस्या पुष्पा रोहोम, जयश्री दरेकर, सुनीता भांगरे, पद्मा थोरात, सोनाली बोराटे, अंजली बोंबले, अंजली काकडे, कारभारी जावळे, निवास त्रिभुवन, शारदा भिंगारदिवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)