शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

दोन हजार व्यापाऱ्यांचे बॅँक खाते सील?

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

अहमदनगर : एलबीटी बंद झाली असली तरी २०१४-२०१५ मधील रिटर्न महापालिकेकडे दाखल न करणाऱ्या दोन हजार व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला

अहमदनगर : राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी बंद केली. एलबीटी बंद झाली असली तरी २०१४-२०१५ मधील रिटर्न महापालिकेकडे दाखल न करणाऱ्या दोन हजार व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा नोटिसा संबंधित व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्यांची माहितीही महापालिकेने विक्रीकर विभागाकडून मागविली आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी मंगळवारी दिवसभर एलबीटी विभागाची तपासणी केली. राज्य शासनाने एलबीटी बंद केली असली तरी त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाचे रिटर्न महापालिकेकडे दाखल करणे गरजेचे होते. तीन हजार व्यापाऱ्यांनी रिटर्न दाखल केले नव्हते. या व्यापाऱ्यांना महापालिकेने नमुना ‘ज’ नुसार नोटीस पाठवून रिटर्न दाखल करण्याचे सांगितले. त्याला केवळ एक हजार व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत रिटर्न दाखल केले. राहिलेल्या तीन हजार व्यापाऱ्यांनी रिटर्न दाखल केले नसल्याची माहिती तपासणीत चारठाणकर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे या दोन हजार व्यापाऱ्यांना महापालिकेने दंडात्मक कारवाई व बॅँक खाती सील का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा पाठवून त्यावर खुलासा मागविला आहे. जे व्यापारी खुलासा करणार नाहीत किंवा त्यांचा खुलासा असमाधानकारक असेल, अशा व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली जाणार आहेत. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी कायम आहे. शहरातील केवळ चार व्यापारी एलबीटी भरतात. मात्र, अनेक व्यापाऱ्यांची उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून त्यांनी एलबीटी न भरण्यासाठी पळवाट शोधली आहे. त्यामुळे विक्रीकर विभागाकडून ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्यांची माहिती महापालिकेने मागविली आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीचा उद्देश त्यामागे असल्याचे उपायुक्त चारठाणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)