शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या ‘एनओसी’नंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST

चंद्रकांत शेळके अहमदनगर : ग्रामपंचायत आणि पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप नगर जिल्ह्यात एकाही ...

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : ग्रामपंचायत आणि पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप नगर जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीने किंवा पालकाने संमती दिलेली नाही. तशी माहिती अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाकडे आलेली नाही. दरम्यान, नगर जिल्ह्यात ८४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढला असून त्यानुसार शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची घंटा आता ग्रामपंचायतींच्या ठरावावर अवलंबून आहे. यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांविना सुरू आहेत. ज्या ग्रामपंचायती माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेतील, त्याच गावात आता शाळा सुरू होणार आहेत. नगर जिल्ह्यात एकूण १५९६ गावे असून त्यातील ८४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे बाराशे शाळा आहेत. यातील एकही शाळा अद्याप सुरू झालेली नाही.

------------------

जिल्ह्यातील एकूण शाळा - ५३७६

शासकीय शाळा - ३१

अनुदानित शाळा - १००५

विनाअनुदानित शाळा - ७१५

एकूण गावे - १५९६

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे -८४९

------------

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे

अकोले - १०६

संगमनेर - १०१

कोपरगाव - ५६

राहाता - ३२

श्रीरामपूर - २९

राहुरी - ४८

नेवासा - ३९

शेवगाव - ७५

पाथर्डी - ५९

जामखेड - ४७

कर्जत - ७१

श्रीगोंदा - ४०

पारनेर - ६३

नगर - ८३

------------

एकूण - ८४९

---------------

आतापर्यंत एकाही गावाचा ठराव नाही

नगर जिल्ह्यात १५९६ गावे आहेत. त्यापैकी किती गावांनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव दिला याची माहिती अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाकडे आलेली नाही. त्यामुळे किती शाळा सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

--------------

पालकांचा होकार

गेल्या दीड वर्षांपासून ॲानलाईन शाळा सुरू असल्याने विद्यार्थी कंटाळले आहेत. सुरक्षिततेचे नियम पाळून शाळा सुरू करण्यास हरकत नाही. विद्यार्थी शाळेत जायला तयार आहेत. पालकांचीही त्यास संमती आहे.

- गौरी राहाणे, पालक.

--------------

कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास हरकत नाही; परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना शाळा सुरू करण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. शाळेने व्यवस्थित काळजी घेऊन शाळा सुरू करावी.

- हेमंत पाटील, पालक.

-----------------

कोरोनामुक्त गावांमध्ये किती शाळा सुरू होणार याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव किंवा पालकांचे संमतीपत्र घेण्याबाबतच्या सूचना तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याची माहिती अद्याप तालुकास्तरावरून आलेली नाही; परंतु लवकरच ती प्राप्त होईल. त्यानुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.