शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST

घारगाव (जि. अहमदनगर) : गावातील महिलांना फेटे, वयोवृद्ध नागरिकांचे लेझीम पथक, मिरवणुकीसाठी सजवलेल्या बारा बैलगाड्या, गावात सर्वत्र रांगोळ्या रेखाटलेल्या... ...

घारगाव (जि. अहमदनगर) : गावातील महिलांना फेटे, वयोवृद्ध नागरिकांचे लेझीम पथक, मिरवणुकीसाठी सजवलेल्या बारा बैलगाड्या, गावात सर्वत्र रांगोळ्या रेखाटलेल्या... आणि तेवढ्यात हेलिकॉप्टर येते. जयघोष सुरू होतो... हा जयघोष कोणा मुख्यमंत्र्यांचा किंवा मंत्र्यांचा नसतो तर तो असतो एका सरपंचाचा. निमित्त होते सरपंचपदाच्या शपथविधीचे. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावचे नवनियुक्त सरपंच पदभार स्वीकारण्यासाठी थेट हेलिकॉप्टरमधून आले अन् गाव आनंदात रंगून गेले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) हा अनोखा शपथविधी पार पडला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे यांनी गावाच्या निवडणुकीत प्रथमच सहभाग घेतला. त्यांचे ९ सदस्यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले. सरपंचपदाची माळही गागरे यांच्याच गळ्यात पडली अन् गागरे सरपंचपदाचा पदभार घेण्यासाठी पुण्यातून आंबी दुमाला या आपल्या गावी आले ते थेट हेलिकॉप्टरमधूनच. सरपंच पदाचा हा सोहळाही भव्यदिव्य करायचा चंग गागरे यांनी बांधला होता. गावात सर्वत्र दिवाळीच्या सणासुदीप्रमाणे सडारांगोळी करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी १२ बैलगाड्या सजविण्यात आल्या होत्या. सर्व महिलांना फेटे बांधण्यात आले अन् सरपंच गावात येताच वृद्धांनी लेझिमच्या तालावर ठेका धरीत गागरे यांचे जंगी स्वागत केले. हेलीपॅडजवळ सर्व गाव एकवटला. गागरे यांचा जयघोष करण्यात आला अन् तेथूनच त्यांची जंगी मिरवणूक सुरु झाली. वाजत-गाजत गागरे यांचे ग्रामपंचायत कार्यालयात आगमन झाले. नंतर त्यांनी पदभार स्वीकारला.

.................

तरुणांना दिला रोजगार

उद्योजक जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. आपल्या कंपन्यांमध्ये त्यांनी गावातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने गागरे पुण्यात राहात असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळेच गावकऱ्यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला.

कोट

गावाकडे चला, हा नारा महात्मा गांधीजींनी दिला होता. त्याच ध्येयाने मी गावात आलो असून, आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी हेलिकाॅप्टरने आलो आहे. गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

-जालिंदर गागरे, सरपंच, आंबी दुमाला.