शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामस्थांच्या विरोधापुढे वाळूतस्कर नमले

By admin | Updated: August 12, 2014 23:17 IST

राहुरी : केंदळ बुद्रुक ग्रामस्थांंनी घेतलेल्या खमक्या भूमिकेपुढे वाळूतस्करांनी वाळूउपसा न करण्याची तोंडी हमी दिल्याने वादावर पडदा पडला.

राहुरी : तालुक्यातील केंदळ बुद्रुक ग्रामस्थांंनी घेतलेल्या खमक्या भूमिकेपुढे नमते घेत वाळूतस्करांनी गावच्या हद्दीतून वाळूउपसा न करण्याची तोंडी हमी दिल्याने या वादावर पडदा पडला. आरडगाव व शिलेगाव परिसरात असलेल्या मुळा नदीच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने विहीरींच्या पाण्याची पातळीने तळ गाठला आहे़ पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी पूर्वीपासून वाळू सुरक्षित ठेवण्यात यश मिळविले़ मात्र काल वाळू तस्करांनी केंदळच्या वाळूकडे लक्ष वेधले़ वाळू उचलण्यास सुरूवात केल्यानंतर ग्रामस्थांनी त्यास मज्जाव केला़ कोणत्याही परिस्थितीत आमच्या परिसरातील वाळू उचलू देणार नाही, असा इशारा देण्यात आला़ अखेर ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता वाळू उचलणार नसल्याची हमी देत वाळूतस्करांनी नमते घेतले. त्यामुळे या वादावर पडदा पडला. बारागाव नांदूरपासून आरडगाव-शिलेगावपर्यंत मोठ्य प्रमाणावर वाळूउपसा झाल्याने विहिरंींनी तळ गाठला आहे़ मात्र केंदळ बुद्रुक परिसरात वाळूची थाप टिकून ठेवण्यात ग्रामस्थांच्या एकीमुळे यश आले आहे़ यासंदर्भात सरपंच गोरक्षनाथ तोरडे, प्रदीप हरिश्चंद्रे, भिमराज चव्हाण, मधुकर तारडे, नरहरी तारडे, विठ्ठल तारडे, अण्णासाहेब तारडे, श्रीकृष्ण भोसले, प्रवीण तारडे, वैभव तारडे आदींनी विरोध केला आहे़ (तालुका प्रतिनिधी)मुळा नदीतून रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे़ केंदळ ग्रामस्थांनी वाळू उपशाला सुरूवातीपासून विरोध केल्याने वाळू सुरक्षित राहिली. वाळू उपसा होऊ नये म्हणून जेसीबीने सीमारेषा आखून देण्यात आली आहे़ तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदनाद्वारे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.- गोरक्षनाथ तारडे, सरपंच केंदळ बुद्रुक