शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात होणार वाळूचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

अहमदनगर : वाळू साठ्यांच्या लिलावात दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा आता ६४ कोटी रुपये किमतीच्या वाळू साठ्यांचे लिलाव होणार ...

अहमदनगर : वाळू साठ्यांच्या लिलावात दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा आता ६४ कोटी रुपये किमतीच्या वाळू साठ्यांचे लिलाव होणार आहेत. चार तालुक्यांमधील तीन नदीपात्रातील ६१ हजार ब्रास वाळू असलेल्या १५ साठ्यांचे लिलाव होणार आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपशाला आळा बसण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पहिले पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत लिलाव जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता याबाबतची प्रक्रिया नव्या वर्षात पार पडणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, वनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा खनिकर्म अधिकारी वासीम सय्यद आदी उपस्थित होते.

गोदावरी, मुळा आणि प्रवरा या तीन नदीपात्रातील वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत. यामध्ये श्रीरामपूर तालुक्यात ५, कोपरगाव तालुक्यात ३, राहुरी तालुक्यात ५, राहाता तालुक्यात २, अशा १५ घाटांचे लिलाव होणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, गोधेगाव, सांगवी भुसार येथील वाळू साठे सरकारी कामांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा साठा ८ हजार ९०० ब्रासचा असणार आहे. १५ साठ्यांमध्ये ६१ हजार ब्रास वाळू असून, ती ६४ कोटी किमतीची आहे. राज्यस्तरीय पर्यावरण समितीने मान्यता दिल्यानंतर १९ साठ्यांचे लिलाव करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यातील १५ साठे लिलावाद्वारे दिले जाणार आहेत.

-----------

जीपीएस यंत्रणेद्वारे सर्वेक्षण

वाळूसाठ्यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी जीपीएस यंत्रणेद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे, तसेच जिल्ह्यात आणखी वाळू साठे आहेत का, याचेही तालुकानिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे.

--------

नव्या नियमांची अंमलबजावणी

गतवर्षी वाळू लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यामुळे वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. नव्या नियमांनुसार लिलाव आता पाच वर्षांसाठी असणार आहेत. मात्र, राज्य पर्यावरण समितीने एक वर्षासाठीच लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. साठ्याचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत उत्खनन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. जनसुनवाई घेऊनच वाळू साठे निश्चित केले जाणार आहेत. लिलावाच्या सर्वोच्च बोलीतून स्वामित्वधन वगळता २५ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीला दिली जाणार आहे.