शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामविकासाचीच कामे करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावाच्या शाश्वत विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, ...

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावाच्या शाश्वत विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, वित्त आयोगाचा हप्ता ग्रामपंचायतींना जमा झाला की, शासन वेगवेगळी परिपत्रके काढून हा निधी खर्च करण्याच्या सूचना देत आहे. आता तर स्ट्रीट लाइट बिल हे वित्त आयोगातून भरावे, असा शासन आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे. वास्तविक यापूर्वी शासन हे बिल भरत होते तसेच ते शासनाने हे बिल भरणे गरजेचे आहे. खर्चासंदर्भात शासन स्तरावर नवनवीन अध्यादेश काढून केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या वित्त आयोगाच्या रकमेला कात्री लावण्यात आली आहे.

वित्त आयोगाच्या पैशाला शासनस्तरावरून गळती लागल्याने गावातील विकास कामावर कसा पैसा खर्च करावयाचा? हा मोठा प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर उभा राहिलेला आहे. वरील आमच्या मागण्या तात्काळ शासनदरबारी कळविण्यात याव्यात अन्यथा सरपंच परिषद राज्यभर आंदोलन करील याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, प्रदेश महिला अध्यक्ष राणी पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे, खारे कर्जुनेचे सरपंच अंकुश पाटील शेळके, दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, निंबोडी सरपंच शंकरराव बेरड, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, इसळकचे सरपंच संजय गेरंगे, धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे, अशोक विरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो २९ सरपंच

ओळी- ओळी- पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा उपयोग विकासकामांसाठीच करावा, अशा मागणीचे सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.