शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

इथेनॉल निर्मितीतून ग्रामविकास शक्य

By admin | Updated: August 19, 2014 02:15 IST

अहमदनगर: जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत़ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्यास परदेशात जाणारे २ लाख कोटी ग्रामीण भागात जातील

अहमदनगर: जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत़ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्यास परदेशात जाणारे २ लाख कोटी ग्रामीण भागात जातील आणि ग्रामीण भागाचा विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले.पद्मशाली समाजाच्या शैक्षणिक संकुल भवनाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले़ भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्याम जाजू, खा़ दिलीप गांधी, आ़ शिवाजीराव कर्डिले, आ़ राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यावेळी उपस्थित होते़ देशाला मोठ्या प्रमाणात इंधन आयात करावी लागते़ ही आयात कमी करून इथेनॉल वापरावर भर दिला जाईल़ नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत़ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होणार असून, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहने इथेनॉलवर चालतील आणि ग्रामीण भागात हा पैसा जाईल, असे यावेळी गडकरी म्हणाले़ पारंपरिक उद्योग काळाच्या ओघात बंद पडले़ त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला़ उद्योग क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे़ स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे़ तुलनेत पारंपरिक उद्योग काळानुसार बदलले नाही़ त्यामुळे या उद्योगांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत़ विडी उद्योगाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ जे काल होते ते आज नाही, असे सांगून नगर शहरातील विडी कामगारांना शासनाच्या योजनेतून घरे देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़ एकविसावे शतक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे़ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याची गरज असून, आपल्याकडील मुले अमेरिकेतील आयटी कंपन्यांत मोठ्या पगारावर नोकरी करत आहेत़ प्रत्येक घरातून डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस झाले पाहिजेत़ त्यासाठी शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे़ शासनाने प्रत्येक गावात इंटरनेटची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे़ जगातील घडामोडींची माहिती काही क्षणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून, प्रत्येक क्षेत्रासाठी इंटरनेट महत्वाचे आहे़ बायो टेक्नॉलॉजीचा अधिक वापर करणे गरजेचे असून, कृषी क्षेत्रात बायो टेक्नॉलॉजी वापरल्यास ग्रामीण भागाचा कायपालट होईल, असे गडकरी यावेळी म्हणाले़ (प्रतिनिधी)