शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पोलिसांची वाढती लाचखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात या वर्षी अवघ्या सात महिन्यांमध्ये १२ पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. चक्क पोलीस ठाण्यांमध्ये ...

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यात या वर्षी अवघ्या सात महिन्यांमध्ये १२ पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. चक्क पोलीस ठाण्यांमध्ये लाचखोरी करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. अशा प्रकारांमुळे पोलीस दलाची डागाळलेली प्रतिमा पुसून टाकण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्यासमोर उभे राहिले आहे.

श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये चक्क पोलीस ठाण्यातच एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय काळे या पोलीस हवालदाराला नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले होते. मात्र, चालू वर्षांतील ही पहिली कारवाई नाही. तत्पूर्वी तब्बल १२ पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. त्यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याशिवाय पोलिसांचा एक खासगी हस्तकही या कारवाईत ताब्यात घेण्यात आला होता. लाचलुचपत विभागाने या दरम्यान नऊ ठिकाणी सापळा रचला होता. मागील वर्षीही पोलीस दलातील पाच कर्मचाऱ्यांवर यशस्वी सापळा लावण्यात आलेला होता.

नाशिक विभागातील लाचलुचपतच्या कारवायांमध्ये नगर जिल्हा अव्वल क्रमांक नोंदवत आहे. अशा प्रकारांमुळे जिल्ह्यातील पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाला आहे. कारण या कारवायांमध्ये बहुतांशी वेळा गुन्हेगारांकडूनच लाच स्वीकारल्याच्या घटना अधिक आहेत. आरोपपत्रांमध्ये मदत करण्यासाठी किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी हे पैसे घेतल्याचे तपासात आढळले आहे. एक हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांमध्ये पैसे घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची प्रकरणे या निमित्ताने समोर आली.

---------

साळवे यांच्या संपत्तीची चौकशी

मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांकडून परवागी मिळाल्यानंतर, प्रसाद साळवे या पोलीस कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक संपत्तीची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी दिली.

--------------

या कारवाईची तरतूद

लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक संपत्तीची चौकशी करणे, प्रथमदर्शनी गरजेचे वाटल्यास, त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली जाते. त्यानंतर, पोलीस खात्यांतर्गत संबंधिताची विभागीय चौकशीही केली जाऊ शकते. लाचखोर कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन केले जाते. त्यानंतर, त्याच्या सेवेवरही परिणाम होतो.

----------

ठाणे प्रमुख झटकतात जबाबदारी

लाचखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रमुखांना जबाबदार धरत, त्यांच्यावर बदलीची कार्यवाही करण्यात आली. अकोले व संगमनेर येथील लाचखोरीची प्रकरणे तेथील निरीक्षकांना भोवली होती. मात्र, तरीही तरीही श्रीरामपुरात लाचखोर पोलीस कर्मचारी मिळून आला. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

---------

कोणताही लोकसेवक कामासाठी पैसे मागत असेल, तर संपर्क साधावा. नाव गोपनीय ठेवले जाईल, तसेच तक्रारदाराचे कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची आमची जबाबदारी राहील.

- हरिश खेडकर, उपअधीक्षक, एसीबी नगर.

-------