शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

महासभेला नव्हे तर स्थायीलाच अधिकार

By admin | Updated: June 25, 2014 00:31 IST

अहमदनगर: बससेवा मनमानी पध्दतीने बंद करून अभिकर्ता संस्थेने महापालिका व नागरिकांना वेठीस धरले आहे.

अहमदनगर: बससेवा मनमानी पध्दतीने बंद करून अभिकर्ता संस्थेने महापालिका व नागरिकांना वेठीस धरले आहे. करारनाम्यातील अटी, शर्तीनुसार स्थायी समितीला निर्णयाचे सर्वाधिकार असून स्थायीचे निर्णय मान्य नसेल तर नगरविकास विभाग (लवाद) अपील करण्याची तरतूद आहे. त्यामुळे शहर बससेवेसंदर्भात महासभेला निर्णय घेण्याचे अधिकारच नसल्याचे पत्र स्थायी समितीचे सदस्य दीप चव्हाण यांनी नगरविकास विभागाला दिले आहे. चव्हाण यांच्या पत्रामुळे सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तोट्याचे कारण सांगत प्रसन्ना पर्पल या अभिकर्ता संस्थेने दि. १८ पासून शहर बससेवा बंद केली आहे. स्थायी समितीने अभिकर्ता संस्थेच्या मागण्या अमान्य केल्याने संस्थेने सेवा बंद केली. सात लाख रुपये दरमहा तोट्यापोटी नुकसानभरपाई व आठ बसेस स्थलांतर करण्यास परवानगी द्यावी अशी संस्थेची मागणी होती.दीप चव्हाण यांनी यासंदर्भात सविस्तर पत्र नगरविकास विभाग व महापालिकेला लिहिले आहे. करारनाम्यातील तरतुदीनुसार इंधन दरवाढ, वाहन देखभाल, दुरूस्ती व वेतन खर्च अभिकर्ता संस्थेने सोसावयाचा आहे. स्थायी समिती व प्राधिकरणाने निश्चित केलेली दरवाढ मान्य नसेल तर तसा प्रस्ताव तयार करून समिती, प्राधिकरणाकडे दाद मागणे हवे होते. करारनाम्यानुसार संस्थेने ३० बसेस शहरात चालविल्या नाहीत. दहा वर्षे सेवा सुरू करण्याचा करार असून बंद करणेपूर्वी तीन महिने अगोदर महापालिकेला तशी नोटीस देणे बंधनकारक आहे. स्थायी समितीचा निर्णय अमान्य असेल तर नगरविकास विभागाकडे दाद मागण्याची तरतूद करारनाम्यात आहे. परंतु स्थायी समितीचा निर्णय प्राप्त होण्यापूर्वी संस्थेने बससेवा बंद करून महापालिकेस वेठीस धरले आहे. अभिकर्ता संस्था महापालिकेशी हुकूमशाही पध्दतीने व्यवहार करत आहे. अभिकर्ता संस्थेबाबत स्थायी समितीने दिलेला निर्णय अंतिम राहणार असून त्यावर नगरविकास विभागाकडे (लवाद) दाद मागण्याची तरतूद करारनाम्यात असल्याने महासभेला यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. तरीही प्रशासन महासभेच्या निर्णयानुसार अभिकर्ता संस्थेला २ लाख ९६ हजार रुपयांची दरमहा नुकसान भरपाई देत आहे. ती करारनाम्याचे उल्लंघन करणारी आहे. शहर बससेवा बंद करून महापालिकेस वेठीस धरणाऱ्या अभिकर्ता संस्थेविरुध्द प्रशासनाने कायदेशीर कारवाई सुरू करावी. नगरविकास विभागाकडे (लवाद) अपील करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी दीप चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)