शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पोलिसांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Updated: June 24, 2014 00:03 IST

अहमदनगर : पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. याची यादीही मुख्यालयात प्रकाशित करण्यात आली आहे.

अहमदनगर : पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. याची यादीही मुख्यालयात प्रकाशित करण्यात आली आहे. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती संकेतस्थळ, तसेच उमेदवारांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे.जिल्ह्यातील १७९ जागांसाठी नऊ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी सर्व चाचण्यांमधून पात्र झालेल्या २ हजार २५६ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती, शुक्रवारी (दि.२०) पोलीस परेड मैदानावर लेखी परीक्षा झाली. या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. सायंकाळी जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक उमेद्वारांना किती गुण मिळाले, याची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर याबाबत काही आक्षेप नोंदवायचे असतील तर त्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. या आक्षेपांचा विचार करून त्यामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा तथ्य आढळले तरच बदल करण्यात येईल. बुधवारी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीवरही आक्षेप घेण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर १७९ जणांची अंतिम निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. उमेद्वारांचे पेपर्स, शारीरिक चाचण्यांचे गुण यामध्ये ताळमेळ साधण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते.