शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

आजच्या ग्रामसभेत होणार ‘तंटामुक्ती’चा ठराव

By admin | Updated: May 1, 2016 01:39 IST

राहुरी : महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव करुन तो स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे़

राहुरी : महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव करुन तो स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे़ त्यामुळे रविवारी किती ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याचा ठराव करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत़ महाराष्ट्रदिनी ग्रामसभा घेणे प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव पारीत करण्याचा विषय घ्यावा व तसा ठराव करुन तो २ मे रोजी तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष व निमंत्रक यांच्या स्वाक्षरीने स्थानिक पोलीस स्टेशनला पाठविण्यात यावा, असा आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे़तत्कालीन गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राज्यात सुरू झाले़ या योजनेतून राज्यातील हजारो गावे तंटामुक्त झाले़ या अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील ७९० गावे तंटामुक्त झाले आहेत़ गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी गावातील वाद स्थानिक पातळीवर मिटावेत म्हणून अभियान सुरू करण्यात आले़ मोहिमेत सहभागी झालेल्या गावांनी ग्रामसभा घेऊन गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित करणारा अहवाल पाठविण्यास या आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे़ मात्र, ठराव घेणाऱ्या गावांमध्ये तंटामुक्ती झाली किंवा नाही, याची पडताळणी कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे़(तालुका प्रतिनिधी)