शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

गोदावरी, प्रवरा कालव्यांतून शनिवारपासून आवर्तन

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

राहाता : गोदावरी आणि प्रवरा कालव्यांतून सिंचन व पिण्यासाठी २३ आॅगस्टला आवर्तन सोडण्यात येणार आहे

राहाता : गोदावरी आणि प्रवरा कालव्यांतून सिंचन व पिण्यासाठी २३ आॅगस्टला आवर्तन सोडण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी नाशिक येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन आवर्तनाची मागणी केली होती. त्यावर दारणा व भंडारदरा धरणातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.गोदावरी आणि प्रवरा कालव्यातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. विखे यांनी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आवर्तनाबाबत आग्रही भूमिका घेतली होती.मंगळवारी मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विभागाचे मुख्य अभियंता जी. एस. लोखंडे यांची भेट घेतली. जलसंपदामंत्री मुश्रीफ, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांच्याशी विखे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी सोडण्याबाबतचा आग्रह धरला.सर्व स्तरावर झालेल्या चर्चेनंतर मुश्रीफ यांनी २३ आॅगस्ट रोजी गोदावरी समूह, भंडारदरा प्रकल्पातून खरीप आवर्तन सुरू करावे, असे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मुख्य अभियंता लोखंडे व अधीक्षक अभियंता पोकळे यांनी कार्यकारी अभियंता बाफना व कोळी यांना आवर्तनाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिष्टमंडळात विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, अण्णासाहेब कडू, संचालक शांतीनाथ आहेर, बन्सी तांबे, रमेश मगर, गीताराम तांबे, रघुनाथ बोठे, रावसाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दीपक तुरकणे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)