शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांकडून सव्वा कोटीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कोपरगाव तालुक्यातील १ हजार ४१६ अपात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कोपरगाव तालुक्यातील १ हजार ४१६ अपात्र लाभार्थींच्या बँक खात्यातून १ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम १२ फेब्रुवारी अखेर वसूल करण्यात आली आहे. ही वसुली मागील सप्टेंबर - ऑक्टोबर २०२० पासून सूर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी देशातील पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष ६ हजार इतकी रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संपूर्ण वर्षभरात दोन हजार रुपये याप्रमाणे तीन वेळा ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. परंतु, या योजनेचा लाभ घेताना काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्या निकषांनुसार जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांना हे अनुदान मिळत आहे. परंतु, निकषात बसत नसतानाही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा शासनाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला.

कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सभाग घेतला होता. त्यापैकी शासनाच्या सर्व्हेत ३ हजार ७३० शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे. या अपात्र लाभार्थींकडून २ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम पुन्हा वसूल करण्यात येणार आहे. त्यापैकी १ हजार ४१६ शेतकऱ्यांकडून १ कोटी २१ लाख वसूल करण्यात आले आहे. तर उर्वरित २ हजार ३१४ शेतकऱ्यांकडून १ कोटी २५ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील सर्वच बँकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. त्यामुळे अशा सर्वच अपात्र लाभार्थींनी त्यांच्या बँक खात्यात रक्कम भरल्यास त्याच खात्यातून बँकेमार्फत ही रक्कम शासनाकडे जमा होत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत वरील रक्कम शासनाकडे जमा झाली आहे.

.........

या योजेनचा लाभ घेतलेल्या सर्वच अपात्र लाभार्थींनी आतापर्यंत जेवढी रक्कम या योजेतून घेतली आहे अशा सर्वच अपात्र लाभार्थींच्या खात्याला रक्कम वसुलीसाठी लिंक लावण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल होत आहे.

-योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव