शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

अकरा वर्षांत जिल्हा परिषदेकडून ३०८ कोटींची घरपट्टी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्ह्यातून सरासरी ३० ते ३५ कोटी रुपये घरपट्टीपोटी वसूल केले जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्ह्यातून सरासरी ३० ते ३५ कोटी रुपये घरपट्टीपोटी वसूल केले जातात. गेल्या दहा वर्षांत जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सुमारे साडेआठ लाख कुटुंबांकडून ३०८ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे. वसुलीचे हे प्रमाण साधारण ८५ टक्के आहे. प्रत्येक गावातून घरपट्टीपोटी ग्रामपंचायतमार्फत कर गोळा केला जातो. आर्थिक वर्षाच्या अखेर हा कर गोळा करून जिल्हा परिषदेकडे भरला जातो. ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींमध्ये ५०० ते १५०० रुपयांपर्यंत घरपट्टी प्रति एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना वसूल केली जाते. यात व्यापारी कारणास्तव दिलेल्या किंवा भाड्याने दिलेल्या घरांसाठी व्यावसायिक दराने घरपट्टीची वसुली करण्याची तरतूद आहे. या अकरा वर्षांपैकी सन २०१०-११ व २०१४-१५ या दोन वर्षांमध्ये घरपट्टीची वसुली विक्रमी ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती. तर २०१५-१६ व २०१७-१८मध्ये वसुलीचे प्रमाण कमी होऊन ते अनुक्रमे ७६ व ७८ टक्के झाले.

नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महापालिका, नगरपालिका वगळून) लोकसंख्या ४२ लाख असून कुटुंबांची संख्या ८ लाख ३८ हजार आहे. त्यांच्याकडून मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४७ कोटी रुपये घरपट्टीची रक्कम वसुलीस पात्र होती. त्यापैकी ३८ कोटी १२ लाख रुपयांची (८१ टक्के) वसुली झाली.

दरम्यान, २०१०-११ ते २०२०-२१ या अकरा वर्षांत वसुलीपात्र ३६१ कोटींपैकी ३०८ कोटींची वसुली झाली. वसुलीचे हे प्रमाण ८५.३४ टक्के आहे.

-----------

गेल्या अकरा वर्षांतील घरपट्टी वसुली

वर्ष वसुली टक्केवारी

२०१०-११ ९.८९ कोटी ९८.८८

२०११-१२ १२.३७ कोटी ८९.५१

२०१२-१३ २६.४१ कोटी ८५.७२

२०१३-१४ ३०.२९ कोटी ८९.५०

२०१४-१५ ३१.६५ कोटी ९२.४२

२०१५-१६ २६.५४ कोटी ७८.४५

२०१६-१७ ३५.८० कोटी ८९.३०

२०१७-१८ ३२.२० कोटी ७८.४५

२०१८-१९ ३२.७३ कोटी ८६.११

२०१९-२० ३२.७८ कोटी ८५.३४

२०२०-२१ ३८.१२ कोटी ८१.१०

-----------------------------------

एकूण ३०८.७३ कोटी ८५.३४

-----------------

तर जिल्हा परिषदेची उत्पन्नवाढ...

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य राजेश परजणे यांनी जिल्हा परिषदेचे किती कर्मचारी मुख्यालयी म्हणजे ते ज्या ठिकाणी नियुक्त आहेत, त्या गावात राहतात, याची माहिती प्रशासनाला विचारली होती. त्यावर जवळपास ९९ टक्के म्हणजे १५ हजार कर्मचारी (यात ११ हजार शिक्षक आहेेत) मुख्यालयी राहतात, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जर हे कर्मचारी मुख्यालयी भाडेतत्वावर राहतात, तर त्यांच्याकडून व्यावसायिक पद्धतीने भाडेवसुली करणे गरजेचे आहे. त्यातून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल, असा मुद्दा परजणे यांनी उपस्थित केला होता. त्यावर ग्रामपंचायत विभागानेही अशी वसुली व्यावसायिक दरानेच होते, अशी माहिती सभागृहाला दिली. खरंच ही वसुली होत असेल तर त्यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होईल.