शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

शहरातील घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

अहमदनगर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांना दिलेले ॲप बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील घंटागाड्यांचा ...

अहमदनगर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांना दिलेले ॲप बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने शहरातील घर ते घर कचरा संकलन करण्यासाठी अभिकर्ता संस्थेची नेमणूक केली आहे. अभिकर्ता संस्थेमार्फत कचरा संकलन केले जाते. महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १९.८७ चौरस किलाेमीटर इतके आहे. शहरातील कचरा घर ते घर संकलन करण्यासाठी ६४ घंटागाड्या आहेत. सुरुवातीला घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली बसवून स्वच्छता निरीक्षकांना ॲप देण्यात आले होे. ॲपमुळे प्रभागात काेणत्या क्रमांकाची घंटागाडी कुठे आहे, हे स्वच्छता निरीक्षकांना समजत होते. मात्र, हे ॲप सध्या बंद आहे. ॲप बंद असल्यामुळे घंटागाडी कुठे कचरा भरते, याची माहिती प्रभागासाठी नियुक्त केलेल्या स्वच्छता निरीक्षकांना मिळत नाही. नागिरकांनी तक्रार केल्यानंतरच स्वच्छता निरीक्षक अभिकर्ता संस्थेच्या पर्यवेक्षकांशी संपर्क करतात. त्यांना सांगून तक्रारीचा निपटरा करण्यास सांगितले जाते. महापालिकेत जीपीएस प्रणाली उपलब्ध नाही. बिलांच्या फाइलला मात्र जीपीएस प्रणालीच्या मॅपची प्रत जोडली जाते. त्याआधारे महापालिकेकडून अभिकर्ता संस्थेला बिल अदा केले जाते. महापालिकेच्या आरोग्य विभागातील संगणकावर ही प्रणाली नाही. मग देयकांच्या वेळी जीपीएस प्रणालीचे मॅप येतात कुठून, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शहरात नवीन प्रभाग रचनेनुसार १७ प्रभाग आहेत. या प्रभागांत नियमित घंटागाड्या जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. असे असताना वेळेवर घंटागाडी येत नाही, अशा अनेक तक्रारी पालिकेत दाखल होत आहेत. या तक्रारींवर स्वच्छता निरीक्षकांकडून कार्यवाही होते. ही कार्यवाही करताना अभिकर्ता संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी लागते. ज्या भागातील तक्रारी आहेत, त्या भागात घंटागाडी पाठविण्याबाबत सांगितले जाते. पर्यवेक्षकाला सांगितल्यानंतर गाडी येते; पण पुन्हा दोन, कधी कधी चार- चार दिवस घंटागाडी वसाहतीत फिरकत नाही. ॲप नसल्यामुळे नागरिकांनाही ऑनलाइन तक्रारी करणे शक्य होत नाही.

...

शहरात दररोज निघणारा कचरा

१३० मेट्रिक टन

...

कचरा संकलन करण्यासाठी लागणाऱ्या गाड्या

६४

...

स्वच्छता निरीक्षकांना दिलेले ॲप बंद

कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवून ते स्वच्छता निरीक्षकांच्या मोबाइलला ॲपद्वारे कनेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्या क्रमांकाची गाडी कुठल्या वसाहतीत आहे, याची माहिती स्वच्छता निरीक्षकांना एका क्लिकवर मिळत होती. मात्र, हे ॲपच सध्या बंद आहे. त्यामुळे घंटागाड्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही.

.....

वेळेवर गाड्या येत नसल्याने कचरा रस्त्यावर

कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. काही भागांत ३ ते ४ दिवसांतून गाडी येते. त्यामुळे नाइलाजाने नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे शहरात पुन्हा अस्वच्छता दिसू लागली आहे.

..

६० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया

शहरातून दररोज १३० टन कचरा संकलन होतो. कचरा संकलन करून तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकला जातो. तिथे ६० टक्के सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होते. उर्वरित कचरा बाजूला काढून ठेवला जातो.

...

कचऱ्याचे वजन खाजगी काट्यांवर

कचऱ्याचे मोजमाप करण्यासाठी डेपोच्या प्रवेशद्वारावर वजन काटा बसविणे प्रस्तावित आहे. मात्र, हे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप वजन काटे बसविलेले नाही. खतप्रकल्प उभे राहतात. मग वजन काट्याचेच काम का रखडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचे स्वत:चे वजन काटे नसल्याने खासगी वजन काट्यांवर कचऱ्याचे वजन केले जात आहे.