शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

पावसामुळे भंडारदरा परिसरात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत ...

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, मुसळधार पावसामुळे भंडारदरा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रचंड प्रमाणात कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत असल्याने भंडारदरा धरणाजवळ असलेल्या अंब्रेला फाॅलमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने पर्यटक गर्दी करू लागले आहेत. पावसाने परिसरातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतीचे बांधच फुटले असून त्यामध्ये लावलेला भात वाहून गेला आहे. काही गावांमध्ये जनावरे दगावली आहेत. जोरदार पाऊस व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. काही ठिकाणी घराची छते उडाली आहेत. साम्रद, रतनवाडी, घाटघर, पांजरे या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. बुधवारी पुन्हा एकदा पाणलोट क्षेत्रातील गावांवर वरुणराजाने वर्षाव केल्याने घाटघर येथे सात इंच पाऊस पडला, तर रतनवाडी येथेही साडेसहा इंच पावसाची नोंद झाली.

परिसरातील उडदावणेची नदी, घाटघरची काळू नदी, रतनगडातून उगम पावणारी प्रवरा नदी, पांजरे येथील धामणओहळ पुलावरून दीड ते दोन फूट धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. यावेळी वन विभागाचे सहायक वनरक्षक गणेश रणदिवे, आरएफओ अमोल आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून वाहतुकीवर नियंत्रण मिळविले. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पाणी कमी होताच वाहतुकीस परवानगी दिली.

......................

२४ तासांतील पाऊस

गत २४ तासांत भंडारदरा येथे १६९ मि.मी. पावसाची नोंद झाली. घाटघर येथे १८० मि.मी., रतनवाडी येथे १७० मि.मी., तर पांजरे येथे १७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाकी येथे १५९ मि.मी. पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढत असून पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कळसूबाई शिखराच्या परिसरातही पावसामुळे ओढे-नाले वाहत आहेत. कृष्णावंती नदीच्या वाकी धरणावरून १५७४ क्युसेकने पाणी वाहत आहे.

...........................

भंडारदऱ्यातून ५०२ क्युसेकने विसर्ग

गुरुवारी सकाळी दहा वाजता अंब्रेला धबधब्यातून प्रवरा नदीमध्ये ५०२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८८५१ दलघमी झाला आहे.

.............

भंडारदरा धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणाच्या २०० व्हॅाल्व्हमधून अंब्रेला फॉलद्वारे ४१३ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉलचा पर्यटकांनी सर्व नियम पाळून आनंद घ्यावा.

- गणेश नान्नोर, जलसंपदा विभाग