शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

रेल्वे क्रॉसिंग धोकादायकच!

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वीच तेलंगणच्या मेडक जिल्ह्यात रेल्वे फाटकावर पॅसेंजरने स्कू ल बसला दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले.

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वीच तेलंगणच्या मेडक जिल्ह्यात रेल्वे फाटकावर पॅसेंजरने स्कू ल बसला दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. नगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील अनेक मुलांना शहरातील नामवंत शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कू ल बस रेल्वे पटरी ओलांडून नेहमीच ये-जा करतात. रेल्वेफाटक सुस्थितीत असले तरीही तेथे कधी दुर्घटना घडेल याचा नेमच नाही. काय आहे या रेल्वे फाटकाची स्थिती याची पाहणी टीम ‘लोकमत’ने केली आहे. त्यात रेल्वे क्रॉसिंग धोकादायक असल्याचं वास्तव समोर आलं. रेल्वे फाटकांची स्थिती समोर मांडणारा हा वृत्तांत....!अहमदनगर : नगर-मनमाड लोहमार्गाच्या लगत असणारे देहरे येथील रेल्वे क्रॉसिंग शॉर्टकट नव्हे तर साक्षात मृत्युचाच शॉर्टकट ठरत आहे. या शॉर्टकट व बेपर्वा क्रॉसिंगमुळे दहा ते बारा जणांचा आतापर्यंत बळी घेतला. जखमी झालेल्यांची तर गणनाच नाही. जीव मुठीत या गावात रोज हजारो पावले रेल्वेचे सर्रास पायवाटासारखा क्रॉसिंग करून मृत्यूला आमंत्रण देत आहे.देहरे (ता.नगर) या गावातूनच हा लोहमार्ग गेल्याने अर्धे गाव इकडे तर अर्धे गाव लोहमार्गाच्या पलीकडे गेले. रोजच गावातील लोकांची इकडून तिकडे ये-जा चालू असते. ती आधी पायी, सायकलवर तर कधी दुचाकीवरून सर्रासपणे एखादी पायवाट ओलांडावी तशी रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी रेल्वे गेट होते. मात्र हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रेल्वे गेट बंद झाले तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत होता. याला पर्याय म्हणून उड्डाण पूल बांधला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. रेल्वेगेट काढण्यात आले. मात्र नागरिकांना या रेल्वेक्रॉसिंग वरूनच जाण्याची वेळ आली. यामुळे आतापर्यंत १०-१२ जणांचा जीव ही गेला. गावाच्या एका भागात सर्व शासकीय कार्यालय, बाजारपेठ, विद्यालय असल्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना या रेल्वेक्रॉसींगवरून शॉर्टकटचा मार्ग धरावा लागत आहे. याचा मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले. याला पर्याय म्हणून भुयारी मार्ग ही काढण्यात आला. भुयारी मार्ग तयार होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झाले. या भुयारी मार्गात पुन्हा नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मध्येच आडवी आली. यामुळे भुयारी मार्ग होऊनही त्याचा फायदा अजुनही ग्रामस्थांना झाला नाही. याकामी मार्गाला कधी मुहूर्त मिळतो याकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. उड्डाणपुलाची गरजकोपरगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत पाच रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत़ या सर्व ठिकाणी भक्कम गेट, गेटमन असला तरी नागरिकांनाच वेळ नसल्याने आपला जीव धोक्यात घालून गेट खालून निघण्याचा प्रयत्न केला जातो़ गेट बंद झाल्याने होणारी गर्दी पाहता शिंगणापूर व पुणतांबा येथील गेटवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग काढण्यात येणे अत्यंत आवश्यक आहे़ कोपरगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत अंचलगाव, शिंगणापूर, कान्हेगाव, संवत्सर, कोपरगाव ते येवला अशी पाच रेल्वे क्राँसिंग गेट आहेत़ येथील यंत्रणा अद्ययावत आहेत. गाडी येणार असल्यास फाटक लावले जाते़ त्यानंतर स्लॉटचा लाईट लागतो़ ही यंत्रणा स्टेशन मास्तरसमोर असलेल्या कंम्प्युटर पॅनलवर आॅपरेट केली जाते़ गाडी निघून गेल्यानंतर स्टेशन मास्तर स्लॉटचा इशारा देतो़ गेटमन समोर असलेल्या यंत्रणेत स्लॉट लाईट लागतो़ त्यानंतरच गेट उघडले जाते़ ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने चांगली असली तरी गेटवरून जाणाऱ्या येणाऱ्यांनाच जीवापेक्षा जास्त वेळेची किंमत झाली आहे़ त्यावरून गेटमनशी भांडणे केली जातात़ फाटकातून दुचाकी वाहने काढणे, सायकलस्वार, विशेषत: शाळकरी मुले-मुली गेटखाली वाकून सायकल काढतात़ शिंगणापूर गेट आणि पुणतांबा गेटवर ही दृष्ये सर्रास पहावयास मिळतात़ 1नगर-मनमाड महामार्गावर असणाऱ्या देहरे गावात जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेटच नाही. नागरिकांसह अबाल-वृद्ध असुरक्षितपणे रेल्वे ट्रॅक ओलांडतात.2राहुरी तालुक्यात धामोरी, वांबोरी स्टेशन, सडे चौकी, राहुरी स्टेशन याठिकाणी रेल्वे चौक्या अथवा गेट आहे. मात्र, नागरिक कशाचीच तमा न बाळगता सर्रास गेटखालून दुचाकी वाहने घेऊन जातात. 3कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याठिकाणी उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग आवश्यक आहे.

संकलन : सचिन धर्मापुरीकर, भाऊसाहेब येवले, नागेश सोनवणे