शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शाळा शुल्ककपातीच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST

कोरोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू असल्याने शाळेतील अनेक भौतिक सुविधांचा वापर झाला नाही तसेच लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांचे उत्पन्न बुडाल्याने शुल्कात ...

कोरोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू असल्याने शाळेतील अनेक भौतिक सुविधांचा वापर झाला नाही तसेच लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांचे उत्पन्न बुडाल्याने शुल्कात कपात करण्याची मागणी पालकांकडून होत होती. त्या सर्व बाबींचा विचार करून सरकारने जुलैमध्ये खासगी शाळांनी एकूण शुल्कात १५ टक्के सवलत द्यावी, असा निर्णय घेतला व त्याच्या अंमलबजावणीबाबत सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नगर जिल्ह्यात अनेक खासगी शाळा आहेत. मुळात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर हा शुल्क कपातीचा निर्णय आला. तोपर्यंत अनेक पालकांनी आधीच शुल्क भरले होते. त्यांना १५ टक्के शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात कपात करून मिळणार आहे; परंतु ज्यांनी शुल्क भरले नाही, त्यांना १५ टक्के सवलत देण्याबाबत शाळा उदासीन आहेत. याबाबत अनेक पालकांच्या तक्रारी आहेत; परंतु त्यांनी त्या अद्याप शिक्षण विभागाकडे दाखल केलेल्या नाहीत. शिक्षक विभागानेच स्वत: काही शाळांना भेटू देऊन खरंच शुल्कमाफीची अंमलबजावणी होते का? याची तपासणी करणे गरजेचे आहे.

-----------

काय आहे शुल्क कपातीचा निर्णय

खासगी शाळांनी पालकांना वर्षभराच्या शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत द्यावी. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. जर पालकांनी पूर्ण शुल्क भरले असेल तर पुढील वर्षात १५ टक्के कपात करावी अथवा शाळा संस्थांनी १५ टक्के शुल्क पालकांना परत द्यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यास विलंब होत असेल तर कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबवू नये. शुल्क कपातीबाबत कोणत्याही प्रकारची अडचण आली तर पालकांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

----------------

शुल्क कपातीबाबतचा शासननिर्णय आल्यानंतर खासगी शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना कळवून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुल्काबाबत पालकांनी अजून तरी काही तक्रार केलेली नाही.

- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

-------------

खासगी शाळांनी यंदा शैक्षणिक शुल्कात १५ टक्के शुल्क कपात करावी, असा शासन निर्णय आहे. त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना तालुकानिहाय गटशिक्षणाधिकाऱ्यांना व तेथून मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. याबाबत शाळा अंमलबजावणी करत नसतील तर पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी.

- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक