शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

ग्रामसुरक्षेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी ...

राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवत बॅरिकेड‌्सच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिले आहे. आपला गाव आदर्श करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.

यादव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेड येथे धनंजय मोरे व उद्योजक नीलेश निकम यांनी दिलेल्या प्रत्येकी ४ अशा एकूण ८ बॅरिकेड‌्सच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी पं.स. सदस्य अण्णासाहेब मोरे, उपसरपंच सचिन मोरे, सोमनाथ वाघमारे, बाळासाहेब मोरे, लक्ष्मण कांबळे, पोपट मोरे, डॉ. विक्रम मोरे, उद्योजक नीलेश निकम, डॉ. वसंत साळुंके, धनंजय मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यादव म्हणाले, कर्जत पोलिसांनी राबविलेल्या अनेक प्रभावी उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या एका फोन कॉलवर अडचणीत असलेल्या कुटुंबांना रात्री-अपरात्री शेकडो तरुणांची मदत होत आहे. या यंत्रणेत प्रत्येकाने आपल्या घरातील दोन सदस्यांची नोंदणी करून घ्यावी. गाव सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेऊन आपले गाव सुरक्षित करा, असेही आवाहन त्यांनी केले.