शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा शहरात केंद्र सरकारविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

नेवासा : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतच्या भारत बंद निमित्त नेवासा तालुका अखिल भारतीय किसान ...

नेवासा : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतच्या भारत बंद निमित्त नेवासा तालुका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे बन्सी सातपुते यांनी केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहेत. त्याचे भविष्यात शेतकऱ्यांवर दुष्परिणाम होतील. शेतीचे भांडवलीकरण मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला.

कॉम्रेड बाबा अरगडे यांनी यापुढे हा लढा अधिक तीव्र करून शेतकऱ्यांनी पूर्ण ताकदीने लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले. नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केंद्र सरकारने आणलेले अन्यायी कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली.

यावेळी आप्पासाहेब वाबळे, बापूसाहेब आढगले, दत्तात्रय गोंधळी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, सतीश तऱ्हाळ, आकाश धनवटे, सौरभ कासावणे, तन्वीर शेख, नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते. तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी निवेदन स्वीकारले.

---

२७ नेवासा आंदोलन

नेवासा येथे भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.