शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

सतरा गावात विकासाची समृद्धी

By admin | Updated: July 5, 2014 00:32 IST

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या नगर जिल्ह्यातील १७ मोठ्या गावांना विविध विकास कामांसाठी ३ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदापर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या नगर जिल्ह्यातील १७ मोठ्या गावांना विविध विकास कामांसाठी ३ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हरित गावामध्ये आता विकास कामांची समृद्धी नांदणार आहे.१० हजार पेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या १७ ग्रामपंचायतीची विकास कामे करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये बेलवंडी (ता.श्रीगोंदा), सुरेगाव, संवत्सर, शिंगणापूर (ता. कोपरगाव), पुणतांबा, लोणी वाकडी (ता. राहाता), बेलापूर, निपाणी वडगाव (श्रीरामपूर), वांबोरी (ता. राहुरी), नागरदेवळे (ता. नगर), पारनेर व निघोज (ता. पारनेर), राशीन, कर्जत, मिरजगाव (ता. कर्जत), घुलेवाडी (ता.संगमनेर) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे़निवडलेल्या १७ ग्रामपंचायतींनी गावात वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम प्रभावीपणे राबविली. गावात हरितपट्टे तयार केले. या गावांचा सन्मान करण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था देऊळगाव राजा व हर्षल ग्रामीण संस्था, चंद्रपूर या संस्थांनी १७ गावांमध्ये विकास कामाचा सर्व्हे केला आणि शासनाला अहवाल सादर केला. पहिल्या टप्प्यात सांडपाणी व्यवस्थापन, भुयारी गटार, दुसऱ्या टप्प्यात रस्ते, पथदिवे, वृक्षारोपन आदी कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलणार आहे.बेलवंडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित योजना राबविली. गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले़ त्यामुळे सरकारने या कामाची दखल घेतली असून, गावच्या विकासासाठी मोठी निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे विकास कामांना गती मिळणार आहे. यातून गावाचा कायापालट होण्यास मदत होईल़-सरस्वती डाकेसरपंच, बेलवंडी